🙏*जय भीम, जय शिवराय, जय लहुजी,* *जय आदिवासी*🙏
🔥 “ *रिकाम्या सभेचा हिशोब द्या — हा* *इशारा नाही, थेट आव्हान* *आहे!”* 🔥
🙏*जय भीम, जय शिवराय, जय लहुजी,* *जय आदिवासी*🙏
🔥 “ *रिकाम्या सभेचा हिशोब द्या — हा* *इशारा नाही, थेट आव्हान* *आहे!”* 🔥
🙏*जय भीम, जय शिवराय, जय लहुजी,* *जय आदिवासी*🙏
🔥 “ *रिकाम्या सभेचा हिशोब द्या — हा* *इशारा नाही, थेट आव्हान* *आहे!”* 🔥
✍️ *लेखक, पॅंथर, पत्रकार, चंद्रकांत जगधने*
*मी पँथर पत्रकार चंद्रकांत जगधने* काल १८ एप्रिल २०२६ रोजी राहुरी येथे झालेली बाळासाहेब आंबेडकर यांची सभा ही केवळ एक राजकीय कार्यक्रम नव्हती तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर उभ्या असलेल्या संपूर्ण चळवळीची, निष्ठेची आणि जबाबदारीची थेट परीक्षा होती, पण त्या दिवशी जे दृश्य उभं राहिलं ते लाजिरवाणं आणि डोळे उघडणारं होतं कारण ज्या ठिकाणी हजारोंची गर्दी अपेक्षित होती तिथे मोजकीच माणसं दिसली आणि मैदानात रिकाम्या खुर्च्यांनीच जास्त उपस्थिती दाखवली, याचा अर्थ सरळ आणि स्पष्ट आहे *संघटना कमकुवत नाही* , *तिला कमकुवत केलं* *जातंय; पदाधिकारी* *कमी नाहीत, पण काम* *करणारे कमी आहेत; आणि समाज* *मोठा आहे, पण जागा* *झालेला नाही,* आणि म्हणूनच हा लेख केवळ टीका नाही तर थेट हिशोब मागणारा आहे.
*वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनो पद घेतलं म्हणजे काम* *पूर्ण झालं असं समजण्याची* *घातक सवय लागली आहे का?* गावोगावी जाणं, लोकांशी संपर्क ठेवणं, विचार पोहोचवणं, सभा यशस्वी करणं, संघर्षाच्या वेळी लोकांना उभं करणं ही तुमची जबाबदारी आहे की नाही? की आज तुमचं राजकारण फक्त बॅनरवर नाव, स्टेजवर भाषण, आणि सोशल मीडियावर फोटो इथपर्यंतच मर्यादित राहिलं आहे? मोठ्या गाड्यांमध्ये फिरणं, स्वतःचा दबदबा दाखवणं आणि वरवरची सक्रियता दाखवणं याला चळवळ म्हणत नाहीत, *याला दिखावा* *म्हणतात* , आणि काही जण तर उघडपणे बाळासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा आधार घेऊन स्वतःचं राजकारण उभं करत आहेत पण संघटना मजबूत करण्यासाठी घाम गाळायला तयार नाहीत, हे केवळ अपयश नाही तर विश्वासघात आहे कारण नेतृत्वाचा वापर करणं सोपं असतं, पण नेतृत्वाला बळ देणं कठीण असतं, आणि तुम्ही सोपं निवडलंय.
*मी पॅंथर पत्रकार चंद्रकांत जगधने* समाजालाही स्पष्ट शब्दात सांगतो विशेषतः मुस्लिम समाजासह सर्व वंचित घटकांना जेव्हा अन्याय होतो, जेव्हा दडपशाही होते, जेव्हा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतो, तेव्हा मोठमोठे पक्ष तुमच्या पाठीशी उभे राहत नाहीत, तेव्हा आंबेडकर विचार आणि आंबेडकर घराणं स्पष्ट भूमिका घेतं, रस्त्यावर उतरून बोलतं, संविधानाची बाजू घेतं, मग त्या नेतृत्वाला तुमची साथ देणं, त्यांच्या सभेला उपस्थित राहणं, त्यांना बळ देणं ही तुमची नैतिक आणि सामाजिक जबाबदारी नाही का? *फक्त हक्क मागणं सोपं आहे, पण त्या हक्कांसाठी उभं राहणाऱ्यांच्या पाठीशी* *उभं राहणं ही* *खरी कसोटी असते* , आणि या कसोटीत आपण कमी पडलो आहोत हे मान्य करावंच लागेल.
आजची ही रिकामी सभा ही फक्त एक घटना नाही, हा इशारा आहे जर पदाधिकारी जागे झाले नाहीत, जर त्यांनी जमिनीवर उतरून काम केलं नाही, जर त्यांनी लोकांशी नाळ जोडली नाही, तर उद्या ही चळवळ कागदावर उरेल आणि मैदान रिकामंच राहील, आणि जर समाजानेही घोषणांपुरतं मर्यादित न राहता कृतीत उतरलं नाही, तर अन्यायाच्या वेळी आवाज उचलणाऱ्यांची ताकदच कमी होईल, म्हणूनच *मी* *पॅंथर पत्रकार चंद्रकांत जगधने* या लेखातून सरळ, स्पष्ट आणि कठोर आव्हान देतो *पदाधिकारी असाल तर काम करा, लोकांमध्ये* *उतरा, संघटना* *उभी करा, अन्यथा पद सोडा; समाज असाल तर फक्त नावाने* *नाही तर कृतीतून आंबेडकरी* *बना; आणि नेतृत्वाला केवळ* *टाळ्या न देता ताकद ** *द्या* कारण इतिहासात नाव त्यांचंच राहतं जे उभे राहतात, लढतात आणि जबाबदारी पेलतात, बाकी सगळे फक्त गर्दीत हरवलेले चेहरे ठरतात.
✍️ *लेखक,पँथर, पत्रकार, चंद्रकांत जगधने*
*मो 7823089822*
*Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015
Read More
|