|
|
युवा पत्रकाराला एकाच महिन्यात दोन राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित
युवा पत्रकाराला एकाच महिन्यात दोन राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित
*सचिन वैद्य यांना राज्यस्तरीय 2025 चा महाराष्ट्र रत्न व आदर्श पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित*
वर्धा जिल्ह्यातील देवळी शहरातील एकमेव व्यक्तीचा एकाच महिन्यात दोन राज्यस्तरीय पुरस्काराचे मानकरी युवापत्रकार तथा समाजसेवक सचिन निर्मला जगनराव वैद्य यांना महाराष्ट्र रत्न पुरस्कार व आदर्श पत्रकारिता पुरस्कार 2025 गौरव करीत सन्मानित केले. दुसऱ्यांदा चंद्रपूर जिल्ह्यात सचिन वैद्य यांना २०२५ चा महाराष्ट्र रत्न पुरस्कारने सन्मान केला त्यामध्ये विविध क्षेत्रातील 88 नामवंत व्यक्तींना महाराष्ट्र रत्न पुरस्काराने गौरव करणारे दर्पण पत्रकार आणि संपादक फाउंडेशन रेल यात्री एकदम मजूर संघ आणि जागतिक मानव अधिकार आणि माहिती हक्क संघटनेच्या वतीने देण्यात आला तर वर्धा जिल्ह्यात अव्यक्त अबोली संस्थेचं आठवं संमेलन देवळीत संपन्न झाले होते त्यात काही मोजक्या पुरस्कारांना सन्मान नाही, तर संमेलनात समाजभूषण, पत्रकारिता आणि साहित्यभूषण अशा विविध क्षेत्रांत कार्य करणाऱ्यांना सात जणांचा गौरव केला. त्यामधील सचिन वैद्य यांना २०२५ चा आदर्श पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यामुळे गावात आनंदाचे वातावरण निर्माण होत ज्येष्ठ समाजसेवक , पत्रकार , उद्योजक तसेच समाजातील सामाजिक व राजकीय नागरिक तथा मित्रांकडून कौतुक करीत शुभेच्छाचा वर्षाव केला जातो आहे.
Read More
|
|
|