जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे झाडतोडीला ‘ब्रेक’ !
पर्यावरणपूरक विकासावर भर
विलास केजरकर भंडारा.
भंडारा: - राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील चौपदरीकरणाच्या कामादरम्यान सुरू असलेल्या वृक्षतोडीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सावंत कुमार यांनी कठोर भूमिका घेतली आहे. ““अपरिहार्य गरज सिद्ध केल्याशिवाय व सखोल तांत्रिक पडताळणीशिवाय एकही झाड तोडले जाणार नाही,” असे निर्देश त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प व्यवस्थापनाला दिले. पर्यावरण प्रेमींच्या आक्रमक भूमिकेनंतर प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करत घेतलेल्या तातडीच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.
शतकजुनी वृक्षसंपदा संकटात..
फुलमोगरा ते कारधा या मार्गावर कडुलिंब, सागवान, चिंच, पिंपळ, करंजी, बाभूळ, आंबा, सिसम यांसारखी सुमारे १०० ते १५० वर्षे जुनी, डौलदार वृक्षसंपदा उभी होती. या झाडांनी केवळ पर्यावरणीय संतुलन राखले नाही, तर अनेक दशकांपासून प्रवाशांना सावलीही दिली. या पट्ट्यातील एकूण ११२ झाडांपैकी आतापर्यंत ४५ झाडांची तोड करण्यात आल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.
पर्यावरणप्रेमींचा दबाव; प्रशासनाचा तत्काळ प्रतिसाद...
वृक्षतोडीच्या विरोधात स्थानिक नागरिक व पर्यावरणप्रेमींनी एकत्र येत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. “विकासाच्या नावाखाली निसर्गाची हानी थांबवावी,” अशी ठाम मागणी त्यांनी केली. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीची बैठक बोलावून संबंधित प्रकल्प अधिकाऱ्यांना जाब विचारला आणि परिस्थितीचा सखोल आढावा घेतला.
विकास’ आणि ‘पर्यावरण’ यांचा समतोल आवश्यक आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशांमुळे पुढील वृक्षतोडीवर आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त होत असून, विकास आणि पर्यावरण यामध्ये संतुलन राखण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.
‘रस्ता रुंद की पर्यावरण संकुचित?’..
महामार्गाचे चौपदरीकरण हा विकासाचा भाग असला, तरी शतकानुशतके उभ्या असलेल्या वृक्षसंपदेचा नाश हा गंभीर मुद्दा ठरत आहे. ही झाडे केवळ सावली देणारी नसून, तापमान नियंत्रण, प्रदूषण नियंत्रण आणि जैवविविधतेसाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. तज्ज्ञांच्या मते, रस्त्याच्या आराखड्यात सूक्ष्म बदल करून किंवा नियोजनपूर्वक उपाययोजना करून अनेक झाडे वाचवता आली असती.
यावेळी डॉ. नितीन तूरस्कर, चंदू वंजारी, चंद्रशेखर भिवगडे, प्रमोद केसलकर, प्रवीण मेहर, मो. सईद शेख, आबिद सिद्दिकी, प्रणय बडवाईक, वैभव चोपकर, सदानंद इलमे, हिवराज उके, नितीन कुथे, हेमंत साकुरे, कविता नागापुरे, विजय निचकवडे, नितीन कुथे, प्रशांत देसाई निवेदन देतेवेळी उपस्थित होते.
एवढी आहेत झाडे
ज्या भागात झाडांची कटाई केली जात आहे, त्या परिसरात
मुंगणा २, निम १६५, करंजी १५, चिचबिल ६, पळस १, सिसू २४, चिचवन १, साऊर १६, महारुख ३, सागवान १०, बाभूळ ७, आंबा ३, सिसम ११, चीचवा ८, कॅशिया १४, करंजी १०, पिंपळ ४ अशी भली मोठी मोठे वृक्षसंपदा असल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
बायपास असताना चौपदरीकरणाचा घाट का ?..
भंडारा शहराला वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी बायपास मार्ग उभारण्यात आला. मात्र, त्यानंतरही शहरालगतच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर चौपदरीकरणाचे काम हाती घेतल्याने “बायपास असताना पुन्हा चौपदरीकरणाची गरज काय?” असा थेट प्रश्न नागरिक, पर्यावरणप्रेमी आणि तज्ज्ञांकडून उपस्थित केला जात आहे.
जिल्हाधिकाऱ्यांकडून पहाणी ...
वृक्षप्रेमी आणि राष्ट्रीय महामार्गाचे अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर जिल्हाधिकारी सावनकुमार यांनी राष्ट्रीय महा मार्गातवर जाऊन सुरु असलेल्या कामादरम्यान कापण्यात आलेल्या झाडांची पाहणी केली. कापलेली झाडे खरंच, गरजेचे होते का? हे तपासून पुढील निर्णय घेतला जाईल असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
*Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015