
समृद्धी महामार्गावर
वाहनांवर लक्ष ठेवण्यासाठी नागपूरपासून मुंबईपर्यंत सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे काम सुरू आहे. जवळपास १,५०० कॅमेरे......
समृद्धी महामार्गावर
वाहनांवर लक्ष ठेवण्यासाठी नागपूरपासून मुंबईपर्यंत सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे काम सध्या जोरात सुरू आहे. जवळपास १,५०० कॅमेरे समृद्धी महामार्गावर लावण्यात येणार आहेत.
नागपूर ते मुंबई समुद्धी महामार्ग गेमचेंजर ठरला असून, नागपूर ते जालना, शिर्डी, नाशिक व ठाण्याकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या कमालीची वाढली आहे. १२० प्रतिकिमी तास कार, तर जड वाहनांकरिता ८० किमी प्रतितास वेगमर्यादा दिलेली आहे.
हा महामार्ग अत्यंत गुळगुळीत आणि गतिरोधक नसलेला आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढलेले आहे. कारण महिन्याला ३ लाख लहान-मोठी वाहने या महामार्गावर धावत असून, मालवाहतूक या करणाऱ्या लॉरीज आता
सीसीटीव्ही कॅमेरे लागण्यास सुरुवात
समृद्धी महामार्गावर धावणाऱ्या वाहनांचा वेग तपासण्यासाठी नव्हे, तर अपघात घडल्यास कंट्रोल रूम तत्काळ अपघातस्थळाचे ठिकाण दाखविणार असून, अपघातस्थळी लवकर मदत मिळणार आहे. सध्या अपघात झाल्यावर वाहनधारकांना नेमके स्थळ सांगताना अडचण होते. कारण मध्ये कोणतेही गाव नसते आणि किमीऐवजी चेनेज यावर स्थळ ठरविले जाते. जे केवळ 'एमएसआरडी'ला कळते. समृद्धी महामार्गावर नागपूर ते वाशिमदरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूंना सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत.
महामार्गाचा उपयोग करताना दिसून येतात. कॅमेरे बसविण्याचे काम दिल्ली येथील एनसीसी या कंपनीला देण्यात आले आहे. उंचावरून ५०० मीटर सरळ आणि २०० मीटर बाजूला कॅमेरे नजर ठेवणार आहेत.,