logo

धाराशिवकरासाठी मोठा दिलासा: शहारातील रस्त्याच्या कामांना कार्यारंभ आदेश -आ राणाजगजितसिंह पाटील


(प्रतिनिधी-विकास वाघ धाराशिव)

जनतेच्या साठ कोटींची बचत!

लवकरच मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन



धाराशिव शहरातील रस्त्यांचा रखडलेला प्रश्न आता निकाली निघाला आहे. निविदेतील २०२३-२४ च्या अंदाजपत्रकीय दरानेच ही सगळी कामे होणार आहेत. त्यामुळे आजच्या दराची तुलना केली असता सरकारचे अर्थात जनतेचे जवळपास साठ कोटी रुपये वाचणार आहेत. तुळजापूर आणि नळदुर्गबरोबरच हे काम सुरू झाले असते तर, कदाचित आत्तापर्यंत सत्तर टक्के काम पूर्णही झाले असते. आता कार्यारंभ आदेश झाले आहेत. लवकरच मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते धाराशिव शहरातील रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन करण्यात येणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

प्रतिष्ठान भवन येथे शनिवारी या अनुषंगाने महत्त्वाची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी शहरातील रस्त्यांच्या कामाचा प्रश्न आता निकाली निघाला असून लवकरच कामास सुरुवात होणार असल्याचे स्पष्ट केले. या कामांसाठी एकूण १८ महिन्यांची कालमर्यादा असली तरीही कालमर्यादेच्या आत ही सगळे रस्ते अगदी दर्जेदाररित्या पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी यावेळी नमूद केले. राज्याचे मुख्यमंत्री ना.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री ना.श्री. एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री ना.श्री. अजितदादा पवार यांनी आपल्या पाठपुराव्याला मोठे बळ दिले आहे. त्यामुळे शहरातील रस्त्यांच्या कामाला आता प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कामाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. आपण स्वतः मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांची भेट घेऊन धाराशिव येथील भूमिपूजन कार्यक्रमाचे निमंत्रण दिले आहे. तिन्ही मान्यवरांनी अनुमती दिलेली आहे. तारीख निश्चित झाल्यावर तातडीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहितीही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

महायुती सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी नेहमीच बळ दिले आहे. आपल्या धारशिव शहरासाठी महायुती सरकारच्या माध्यमातून विशेष बाब म्हणून मोठ्या प्रमाणात विकास निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. महायुती सरकारच्या माध्यमातून शहरातील रस्त्यांसाठी १४० कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला. मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि नगरविकास मंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री मा.श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांनी विशेष बाब म्हणून धाराशिव शहरासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला. शहरातील रस्त्यांसाठी एवढा ऐतिहासिक निधी यापूर्वी कधीही मिळाला नव्हता. या निधीच्या माध्यमातून शहरातील रस्त्यांचे काम आता वेगात केले जाणार आहे. आपल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या विशेष सहकार्यातून तत्कालीन मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे यांनी १४० कोटी रूपयांच्या या विशेष प्रस्तावाला मंजुरी दिली होती. मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री मा.श्री. एकनाथजी शिंदे, मा.श्री. अजितदादा पवार, पालकमंत्री प्रतापजी सरनाईक, संपर्कमंत्री जयकुमारजी गोरे साहेबांचेही यासाठी मोलाचे सहकार्य लाभले आहे. वरील सर्वांचे सबंध धाराशिव शहरवासीयांच्या वतीने आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मनःपूर्वक धन्यवादही मानले आहेत.

28
1827 views