logo

खापर येथील जिल्हा परिषद शाळेची इमारत पडकी व गळकी झाल्याने विद्यार्थ्यांचा जिव धोक्यात व विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा खेळ खंडोबा

अक्कलकुवा प्रतिनिधी: (गंगाराम वसावे)
खापर येथील जिल्हा परिषद शाळेची इमारत पडकी व गळकी झालेली असून गेल्या दोन दिवसा पासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे वर्ग खोली मध्ये गुडगा भर पाणी साचलेले असून मुलाच्या जीवितास धोका निर्माण झाला असून पालकांनी तक्रार केल्या नंतर शिक्षण विभाग जागे झाले असून ग्रामपंचायत समाज मंदिरात तात्पुरती मुलांची सोय करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.
खापर गावाची लोकसंख्या जवळपास 20 हजार असून येथे ज़िल्हा परिषदेची मुलांची केंद्र शाळा आहे. शाळा स्थापने पासून असलेली ईमारत जुनीच असून पूर्वी कौलरू असलेली शाळा लोखंडी पत्रे लावून कामाचलाऊ पद्धतीने शाळेचे काम सुरु असून पहीली ते चौथी पर्येंतचे वर्ग येथे भरत असून आज घडीला गोर गरिबांची फक्त 50 विध्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत.तर आर्थिक सबळ असणाऱ्या पालकांची मुले खाजगी इंग्रजी माध्यमातून शिक्षण देणाऱ्या शाळेतून शिक्षण घेत आहेत. खाजगी माध्यमाच्या शाळा या पुढाऱ्याच्या असून त्यांना जिल्हा परिषद शाळेविषयी अनास्था असल्यामुळे आज पर्यंत या शाळेकडे दुर्लक्ष झालेले आहे.
या शाळेची पटसंख्या 250 पर्यंत होती. तेव्हा दोन दोन तुकड्या होत्या व सात ते आठ शिक्षक येथे कार्यरत होते. कधीकळी ही शाळा नावाजलेली होती या शाळेतून शिक्षण घेऊन कोणी कलेक्टर, डॉक्टर, इंजिनियर, वकील, शिक्षक, संस्था चालक या सह राजकीय नेते कार्यकर्ते झालेत मात्र शाळेविषयी अनास्था असल्यामुळे आज 50 विध्यार्थी व दोन शिक्षक अशी अवस्था या शाळेची झालेली आहे.
या शाळेची सुस्थितीतील इमारत ग्रामपंचायत ने पाडून जीर्ण वर्गखोल्या असलेली इमारत राहू दिली असून. शाळा परिसरात पेवर ब्लॉक ओटा पेक्षा वर करून दिल्या मूळे सध्या पाणी वर्ग खोल्यात जात असून विध्यार्थी च्या जीवाशी खेळ चालवला जात आहे. याकडे शिक्षण विभागाने लक्ष देऊन विध्यार्थी च्या शिक्षणाचा खेळ खंडोबा थांबवावा अशी मागणी विध्यार्थी पालक करीत आहेत.
सदर शाळा इमारत ही जीर्ण झालेली असून नवीन इमारत बांधा या साठी वेळोवेळी शाळेने जिल्हा परिषद प्रशासनला स्ट्रक्चरल ऑडिट करून नवीन इमारत बांधकाम करा म्हणून 2021 पासून ते आज पावेतो पत्र दिले आहेत मात्र या कडे जी.प. च्या शिक्षण विभागाने दुर्लक्ष केलेले असल्यामुळे शाळेची आजची अवस्था असल्याचे पालकांचे मत आहे. प्रशासनाने या कडे गांभीऱ्याने लक्ष घालून नवीन इमारत लवकरात लवकर तयार करून मुलाची शेक्षणिक गरज भागवावी अशी मागणी होत आहे.
दरम्यान शिक्षण विभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी आरती शिंपी यांनी शाळेला भेट देऊन तेथील अडचणी समजून घेऊन शाळा या धोकेदायक इमारतीत ना भरवता ग्रामपंचायत च्या समाज मंदिराच्या इमारतीत भरवावे अशी. सूचना केली या वेळी त्यांचे सोबत केंद्र प्रमुख वसंत गावीत होते. त्यानी वरिष्ठाना अहवाल पाठवला असून मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी पडक्या व गळक्या शाळेत विध्यार्थी बसवू नये असे आदेश दिले आहेत.

56
1168 views