logo

विकासाची साखळी तुटायला नको :- राजे अम्ब्रीशराव महाराज. कमलापूर येथे प्रचार सभा संपन्न!

अहेरी:- प्रतिनिधी /दिलीप शेडमाके, कमलापुर येथे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत बोलतांना देशात भाजपाची सरकार येणार हे निश्चित आहे तेव्हा इतर पक्षाचा खासदार निवडुन आल्यास क्षेत्राचेच नुकसान होणार आहे.पंतप्रधान मोदीजींनी जगभरात भारताची मान ऊंचावली तसेच राज्यात भाजपचे सरकार आहे आणि केंद्रात भाजपचेच राहणार त्यात दुसर्‍यापक्षाचा खासदार आल्यास साखळी पुर्ण होणार नाही पर्यायाने क्षेत्राचेच नुकसान होणार तसेच मोदीजींनी या क्षेत्रात विज आणि रस्ते पाठविले आपण येथून भाजपचा खासदार पाठवु या असे आवाहन केले.वाजागाज्याने राजे साहेबांचे स्वागत करण्यात आले आणि प्रत्येक चौकात नागरीकांनी मोठ्या संख्येने भेट घेतली.त्यामुळे कमलापुर परिसरातले वातावरण भाजपमय झाले.!


याप्रसंगी परीसरातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते!

48
5319 views