Sandeep , Nanded 29/09/2023 09:09 PM Edit Delete नांदेड जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत 29 व 30 सप्टेंबर रोजी पंडीत दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, आनंदनगर रोड, बाबानगर नांदेड कार्यालयाचा ई-मेल nandedrojgar@gmail.com किंवा 02462 (251674) व योगेश यडपलवार 9860725448 वर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी केले आहे. या रोजगार मेळाव्यात नामांकित कंपन्याकडून मुलाखत घेण्यात येणार आहेत. बेरोजगार उमेदवारांनी www.mahaswayam.gov.in या वेबसाईटवर नाव नोंदणी करावी. उमेदवारांना शैक्षणिक पात्रतेनुसार रोजगार उपलब्ध करुन घेता येईल. या संधीचा लाभ जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांनी घ्यावा, असेही जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत कळविले आहे. आर्यन असेथिंटीक प्रा.ली या कंपनीत टेलर 10 रिक्त पदासाठी इयत्ता 10 वी पास/नापास स्त्री/पुरुष उमेदवारांची भरती करावयाची आहे. नवकिसान बायो प्लानेटिक लिमिटेड या कंपनीत सेल्स रिप्रझेंटिव्ह या 30 रिक्त पदासाठी शैक्षणिक पात्रता 10 वी 12 वी, पदवीधर असून वय 21 ते 35 वर्षाच्या उमेदवारांसाठी भरती करण्यात येणार आहे. लाईफ इन्सुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या कंपनीत लाईफ इन्सुरन्स ॲडव्हायझर 42 रिक्त पदासाठी भरती करण्यात येणार आहे. या पदासाठी शैक्षणिक पात्रता इयत्ता 10 वी 12 वी, पदवीधर आहे. तरी बेरोजगार उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.0000 .......... read more 8 2435 views 0 comment 1 Shares Sandeep , Nanded 29/09/2023 10:09 AM Edit Delete *हृदयाचा वापर करा आणि ह्रदय जाणून घ्या...**_Use Heart - Know Heart_*लोकांमध्ये जनजागृतीसाठी व हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी जागतिक हृदय दिन दरवर्षी २९ सप्टेंबर रोजी जगभरात साजरा केला जातो. यासाठी प्रत्येकाने स्वतःची व आपल्या प्रियजनांची चांगली काळजी घेणे तसेच हृदयाच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रत्येकाला निरोगी आणि सक्रिय जीवनशैलीचे पालन करण्यास प्रोत्साहित करते. या अभियानाद्वारे *Teach One - Each one* या संकल्पनेतून प्रत्येक व्यक्तीत ह्रदय आरोग्याविषयी जागरुकता निर्माण केल्यास निश्चितच ह्रदयरोगाचा धोका कमी होईल. *वर्ल्ड हार्ट फेडरेशनच्या* मते, हृदयरोगामुळे जगात दरवर्षी अंदाजे १७.७ दशलक्ष मृत्यू होतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार गेल्या दोन दशकांमध्ये हृदयरोगामुळे जगभरात सर्वाधिक मृत्यू झाल्यामुळे हा आजार खूप घातक असल्याचे अधोरेखित झाले आहे. WHO ने जारी केलेल्या अहवालात 2000 ते 2019 या 20 वर्षांच्या कालावधीत विविध आजारांमुळे झालेल्या मृत्यूंची नोंद घेण्यात आली आहे. जगभरात मृत्यूला कारणीभूत ठरणार्या दहा आजारांपैकी सात असंसर्गजन्य आजार आहेत. या यादीवर नजर टाकल्यास हृदयरोग किंवा हृदयविकार पहिल्या स्थानी असल्याचे दिसून येते. भारतीय अहवालानुसार हृदयरोगामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण २०२० पर्यंत ४.७ दशलक्ष प्रतिवर्ष असून ते वेगाने वाढत आहे. सध्या हृदयविकाराच्या झटक्याला वयाची अट राहिली नाही. अगदी कमी वयातही हार्ट अटॅक येत आहे. कोरोना नंतर तर हृदयरोगाचे प्रमाण अधिक वाढलेले दिसून येते. जणु काही ह्रदय रोगाची लाटच आली आहे. निसर्गतः भारतीयांना पाश्चिमात्य लोकांपेक्षा ह्रदयरोगाचा धोका अधिक संभवतो; कारण भारतीयांच्या ह्रदयाच्या रक्तवाहिन्यांचा आकार हा लहान आहे. लोकसंख्येचा विस्फोट अन् त्यातून निर्माण झालेली स्पर्धा व ताणतणाव यामुळे भारतीयांमध्ये ह्रदयरोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.*हृदयविकाराचा झटका काय असतो ?* आपल्या हृदयाचा रक्त पुरवठा तीन बाजूंनी होतो. शरीरातील कोलेस्टेरॉल वाढल्यामुळे हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होतात. 40% पर्यंत अडथळा जास्त समस्या निर्माण करत नाही. जेव्हा हा अडथळा 70%पेक्षा जास्त वाढतो तेव्हा हृदयातील रक्त प्रवाह मंद अथवा बंद होतो आणि रूग्णास हृदयविकाराचा झटका येतो.*हृदयविकाराची कारणे*1. मधुमेह2. उच्च रक्तदाब3. लठ्ठपणा4. अनियमित आहार व व्यायाम5. व्यसनाधिनता6. तणावपूर्ण जीवनशैली 7. अनुवंशिकता 8. वाढलेली रक्तातील कोलेस्ट्रॉल (चरबी) पातळी9. बैठी जीवनशैली 10. प्रक्रिया केलेल्या आणि पॅकेज केलेल्या पदार्थांचा अधिक वापर (fast food) *हृदयरोगाची लक्षणे*1. छातीत दुखणे, जळजळ होणे2. छातीत आवळणे / जड वाटणे3. पाठदुखी / खांदे दुखी / हात दुखणे4. अस्वस्थता, छातीत धडधड होणे5. धाप लागणे, घाम येणे6. मानेत त्रास होणे, जबडा दुखणे, घसा, पोटामध्ये किंवा मागे बाजूला दुखणे7. चक्कर येणे, उलटी किंवा मळमळ,अशक्त वाटणे8. पाय किंवा गुडघे यावर सूज येणे, थकवा येणे*हृदयरोग निदान व उपचार*हृदयरोग निदान करण्यासाठी हृदयरोग तज्ज्ञ खालील तपासणी करतात1. इ सी जी2. 2D इको3. ट्रेडमिल टेस्ट4. कोरोनरी अँजिओग्राफी5. रक्तातील हृदयविकारासंबंधी चाचण्या उदा. - HsTROP I6. २४ तास होल्टर study7. छातीचा एक्स-रेहृदयविकाराच्या झटक्याचे निदान झाल्यानंतर कोरोनरी अँजिओप्लास्टी ह्या ह्रदयरोगावरील उपचार पद्घतीद्वारे हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा करणार्या बंद रक्तवाहिन्या (कोरोनरी आर्टरीज) स्टेंटद्वारे उघडल्या जातात व रक्तवाहिन्यांमधील रक्त प्रवाह पुन्हा सुरळीत केला जातो. ह्यामुळे रूग्णाच्या जीवितास होणारा संभाव्य धोका टळतो. ही एक जीवनदायी उपचार पद्धती आहे. गरज पडल्यास बायपास सर्जरी करण्यात येते. *हृदयरोग प्रतिबंध*१) नियमित व्यायाम - दररोज अर्धा तास चालणे (उदाहरणार्थ- फ़ास्ट चालणे, जॉगिंग,साइक्लिंग, पोहणे ) वजनावर व्यायामाने नियंत्रण आले म्हणजेच आजारांवरही नियंत्रण येते.२) धूम्रपान वर्ज करणे - अति धुम्रपानामुळे अचानक होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. ( Sudden Cardiac Death) ३) दारूचे व्यसन टाळणे४ ) निरोगी आहार- संतुलित निरोगी आहार असावा. जेवणाचे ताट हे विविध पदार्थानी युक्त (रंगीबेरंगी) असावे. आहारामध्ये मिठाचे प्रमाण (१.५ ग्रॅम / दिवस) नियंत्रित असावे. हिरव्या पालेभाज्या व फळांचा समावेश असावा.५) जीवनशैलीत बदल -ताणतणाव (*STRESS*) या शब्दातच त्याचे व्यवस्थापन दडले आहे. * *S*-Strength - व्यायाम + ध्यानधारणा* *T*-Time management वेळेचे व्यवस्थापन * *R*-Relations नातेसंबंध आप्तेष्ट, मित्र आणि इतर नाती जपणे. * *E*- Easy going-नात्यांतील सहजता * *S*-Saving,Insurance, आर्थिक बचत, विमा * *S*-Spirituality - अध्यात्मिकता५) *आरोग्याची KYC* ( Know Your Counts) तुमचं वजन, रक्तदाब, शुगर, BMI आणि कोलेस्ट्रॉल याची माहिती असणे व नियमित तपासणी करणे. ६) डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या वेळेत खाव्यात व त्या स्वतःहून बंद करू नयेत.*Key Massege - मूलमंत्र* निरामय जीवनशैलीची ABCD ... * A - Anxity - ताणतणाव व्यवस्थापन* B - Bottle - मद्यपानावर नियंत्रण /प्रतिबंध* C - Cigarettes - धुम्रपानावर प्रतिबंध* D - Diet - योग्य आहार* E - Exercise - योग्य प्रकारचा व्यायाम* F - Friends - मित्र असावेत. तणाव नियंत्रणास मदत होते.* G - Guru - आयुष्यास योग्य दिशा मिळण्यास गुरूची/पालकांची आवश्यकता असते.* H - Humor - विनोद आयुष्य आनंदी करते. * I - Insurance - health insurance. आरोग्य विमा, संकट काळी मदत होते. * J - Joy - आनंद *दवा में कोई खुशी नही* *और खुशी जैसी कोई दवा नही** K - Knowledge - ज्ञानी असणे * L - Legitimate - कायद्याचे पालन करणे.इत्यादी... जागतिक हृदय दिनाच्या निमित्ताने विविध चर्चा, मॅरेथॉन, क्रीडा स्पर्धा, स्टेज शो सारख्या कार्यक्रमांचे जनजागृतीसाठी जगभर आयोजन केले जाते त्यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होणे आवश्यक आहे.या वर्षीचे घोषवाक्य *"Use Heart, Know Heart”* हे आहे. त्यामुळे सर्वांनी आपले हृदय जाणून घेणे आवश्यक आहे.जागतिक हृदयदिनाच्या निमित्ताने त्याचे महत्त्व समजून तुमच्या आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या हृदयाच्या आरोग्याकडे अधिक लक्ष द्या आणि निरोगी जीवनशैलीचा अवलंब करा. तुम्हाला हृदयरोगाची लक्षणे जाणवल्यास त्वरीत तज्ञांशी संपर्क करावा. *आहार, विहार, व्यवहार आणि मनःशांती हीच शतायुषी होण्याची चतुःसुत्री होय.* सुप्रभात ,आपल्या हृदयाची चांगली काळजी घ्या.🌷🌈💐💓💓❤️❤️ .......... read more 10 2131 views 0 comment 1 Shares Sandeep , Nanded 25/09/2023 07:09 PM Edit Delete नांदेड () दि. 25 :- जिल्ह्यातील विविध विकास कामांना गती देण्यासाठी सर्व विभागाचा समन्वय महत्वाचा आहे. एकमेकांच्या समन्वयातून विकास कामांची गती वाढविण्यासाठी सर्व विभाग प्रमुखांनी प्रयत्नशिल असणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले. डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, उपजिल्हाधिकारी संतोषी देवकुळे, सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे, प्रविण साले, सुरेशदादा गायकवाड, साहेबराव गायकवाड, मिलींद देशमुख, प्रतापराव पावडे, बंडू पावडे, श्रावण पाटील भिलवंडे, रंजनाताई व्यंकटराव कदम, विनायकराव शिंदे, बाबुराव देशमुख, सरपंच दिगंबर जगदंबे, सुभाषराव शिंदे, रविंद्र पोतगंटीवार, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, पंचायत समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि विविध संबंधित विभागाचे अधिकारी यांची उपस्थिती होती. जिल्हा वार्षिक योजना, दलितवस्ती, तांडावस्ती अशा विविध योजनाच्या माध्यमातून निधी प्राप्त होतो. या निधीच्या माध्यमातून अनेक विकासात्मक कामे जिल्ह्यात सुरु असून काही प्रलंबित स्वरुपात आहेत. विकास कामे प्रलंबित राहील्यास निधी वेळेत खर्च होत नाही. परिणामी नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे विभाग प्रमुखांनी एकमेकात समन्वय ठेवून विकास कामांना गती द्यावी व कामे तात्काळ पूर्ण करावेत, असे निर्देश खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दिले. या बैठकीत जिल्ह्यातील मानसपूरी ते बहादरपूरा रोड - नॅशनल हायवे जोडून राहीलेल्या रस्ता, सिडको कॉर्नर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, नांदेड –उस्माननगर-हाळदा-मुखेड-बिदर रोड, कहाळा-गडगा रोड वरील मांजरम गावाजवळ शिल्लक राहिलेल्या रस्त्याचे काम, मांजरम-बेंद्री रोड वरील पानंद रस्त्यावर नाला काढणे, नायगाव तालुक्यातील सांगवी गावातील पिण्याचे पाणी व विविधा नागरी समस्या, नांदेड तालुक्यातील वाडी बु. नगरपंचायत आणि धर्माबाद तालुक्यातील कारेगांव फाटा येथील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळयासंदर्भातील कामाबाबत या बैठकीत आढावा खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी आढावा घेतला. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्राप्त निधी वेळेत खर्च करुन विकास कामे तात्काळ मार्गी लावण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. नांदेड शहरात दोन एकर जागेवर पर्यटन विकासात भगवान गौतम बुध्दाचे स्मारक येत्या काळात उभारण्याचे नियोजन असून याबाबत मनपाच्या वतीने शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे असे खासदार पाटील यांनी यावेळी सांगितले. नारी शक्ती वंदन विधेयक संसदेत मंजूर झाले. या औचित्याने जिल्हाप्रशासनाच्यावतीने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा सत्कार करण्यात आला .......... read more 1 2 385 views 0 comment 0 Shares Sandeep , Nanded 19/09/2023 09:09 PM Edit Delete नांदेड पोलीस दला तर्फे येणाऱ्या गणेश चतुर्थी, आनंत चतुर्थी,ईद ए मिलाद या निमित्त शहरांमध्ये शांतता सुव्यवस्था अबाधित राहावे यासाठी पथसंंचलन घेण्यात आले .......... read more 1 15 2027 views 0 comment 1 Shares Sandeep , Nanded 16/09/2023 04:09 PM Edit Delete जनसंपर्क कक्ष (मुख्यमंत्री सचिवालय)शुक्रवार, दि. 16 सप्टेंबर, 2023 *मराठवाड्याच्या कायापालटाचा संकल्प* – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे* 46 हजार कोटींहून अधिक विकास कामे----छत्रपती संभाजीनगरातील राज्य मंत्रिमंडळ बैठकीत अनेक लोकाभिमुख निर्णय छत्रपती संभाजीनगर, दि. 16 :-मराठवाड्याचा कायापालट घडविणारा तब्बल 46 हजार 579 कोटी 34 लाख रुपयांचा संकल्प आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला. छत्रपती संभाजीनगर येथील राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारपरिषदेत ते बोलत होते.यामध्ये आजच्या मंत्रिमंडळबैठकीत घेतलेल्या 9 हजार 437 कोटी 90 लाख रुपये खर्चाच्या कामांचा देखील समावेश आहे. या पत्रकारपरिषदेस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.प्रारंभी मुख्यमंत्र्यांनी औरंगाबाद महसूल विभागाचे नामकरण छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नामकरण धाराशिव केल्याचे जाहीर केले. या नामकरणाबाबतची अधिसूचना जाहीर झाल्याने, या दोन्ही नामकरणांवर शिक्कामोर्तबचे झाल्याचेही त्यांनी सांगितले. मराठवाडा मुक्ती संग्रामाचे नेतृत्व करणारे स्वामी रामानंद तीर्थ यांचा पुतळा नवी दिल्ली येथे उभारण्यात येईल. तसेच छत्रपती संभाजीनगर मधील 300 वर्षे जून्या तीन पुलांचे नुतनीकरण करण्याचा निर्णयही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला. मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त 2016 नंतर आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक छत्रपती संभाजीनगर येथे झाली. 2016 मध्ये आपण मुख्यमंत्री असताना घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी झाल्याबद्दलची माहिती उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिली.आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत जलसंपदा,सार्वजनिक बांधकाम, नियोजन, ग्रामविकास, कृषी तसेच पशूसंर्वधन आदी विभागांशी निगड़ीत विविध निर्णय घेण्यात आले. पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी मराठवाडा विभागात सुरु असलेल्या विकास कामांची माहिती दिली.मराठवाड्यातसुरूअसलेल्याकामांचीविभागनिहायमाहितीपुढीलप्रमाणेजलसंपदा – २१ हजार ५८० कोटी २४ लाख रुपये, सार्वजनिक बांधकाम-१२ हजार ९३८ कोटी ८५ लाखपशुसंवर्धन, दुग्धविकास,मस्त्यव्यवसाय- ३ हजार ३१८ कोटी ५४ लाख, नियोजन – १ हजार ६०८ कोटी २८ लाख, परिवहन – १ हजार १२८ कोटी ६९ लाख, ग्रामविकास – १ हजार २९१ कोटी ४४ लाख, कृषी विभाग – ७०९ कोटी ४९ लाख, क्रीडा विभाग – ६९६ कोटी ३८ लाख, गृह – ६८४ कोटी ४५ लाख, वैद्यकीय शिक्षण – ४९८ कोटी ६ लाख, महिला व बाल विकास – ३८६ कोटी ८८ लाख, शालेय शिक्षण – 490 कोटी ७८ लाखसार्वजनिक आरोग्य -35.37 कोटी, सामान्य प्रशासन- 287 कोटी, नगरविकास – २८१ कोटी ७१ लाख, सांस्कृतिक कार्य- २५३ कोटी ७० लाख, पर्यटन – ९५ कोटी २५ लाख, मदत पुनर्वसन – ८८ कोटी ७२ लाख, वन विभाग - ६५ कोटी ४२ लाख, महसूल विभाग- ६३ कोटी ६८ लाख,उद्योग विभाग- ३८ कोटी, वस्त्रोद्योग -२५ कोटी, कौशल्य विकास-१० कोटी, विधी व न्याय- ३ कोटी ८५ लाख▪️जलसंपदाविभाग - मराठवाड्यातला दुष्काळ हटविणार. पश्चिमवाहिनीनद्यांचे समुद्रातवाहुनजाणारेपाणीगोदावरीखोऱ्यातवळविणार. २२.९अ.घ.फुटपाणीवळविण्याची १४ हजार ४०कोटींची योजना राबविणार.▪️पैठण येथील संतज्ञानेश्वरउद्यानाचे रूप पालटवणार. १५०कोटी▪️वैजापूर तालुक्यातील शनिदेवगावला उच्चपातळीचा बंधारा. १७९३हेक्षेत्रसिंचितहोणार. २८५ कोटी ६४ लाखनियोजनविभाग - मराठवाड्यातील विविध तीर्थक्षेत्रांचा विकास करणार▪️वेरूळ येथील श्रीक्षेत्रघृष्णेश्वरमंदिराचा सुधारितविकासआराखडा.१५६.६३कोटी▪️तुळजाभवानीमंदिराचा१३२८कोटीचा विकास आराखडाश्री क्षेत्र औंढा नागनाथ तीर्थक्षेत्रविकास. ६०.३५ कोटी• उदगीर येथे बाबांच्या समाधीस्थळविकासआराखड्यासाठी १कोटी• सिल्लोड तालुक्यातील मोजे केळगावचे श्री. मुर्डेश्वरमहादेवमंदिरदेवस्थानाच्या ४५ कोटींच्या विकास आराखड्यासमान्यता• पाथरी येथे साईबाबातीर्थक्षेत्रविकासआराखडा. ९१.८०कोटी• मानव विकास कार्यक्रमात 100 बसेस पुरविणे. 38 कोटीमहिलावबालविकासविभाग - मराठवाड्यातील ३४३९ अंगणवाड्यांच्या बांधकामांचा तीनवर्षांचाकालबद्धकार्यक्रम. ३८६.८८कोटी(शालेय शिक्षण)• मराठवाड्याचीराणीलक्ष्मीबाईस्व. दगडाबाईशेळकेयांचेधोपटेश्वरयेथे यथोचितस्मारक उभारणार. ५ कोटी• मराठवाड्यातीलस्वातंत्रसेनानीच्या गावातील शाळा भारतरत्नडॉ. बाबासाहेबआंबेडकरआदर्शशाळायोजनेतून विकसित करणार.७६ तालुक्यांतून शाळा निवडणार. विविध सुविधांसाठी ९५कोटी.• बीडजिल्ह्यांतील उस तोड कामगारांच्या मुलींसाठीकस्तुरबागांधीबालिकाविद्यालययोजना. १६०० मुलीना लाभ. ८०.०५कोटी• मराठवाड्यातीलनिजामकालीनशाळांची दुरुस्ती वपुनर्बांधणी करणार. २०टक्केलोकसहभागाचीअटशिथिल. २००कोटीखर्च• परभणीजिल्ह्यातीलसोनपेठआणिपालमतालुक्यांमध्येकस्तुरबागांधीबालिकाविद्यालयसुरु करणार. ४००मुलींना शिक्षण घेणे शक्य. २०.७३कोटी खर्च(क्रीडा विभाग)• परभणी जिल्हाक्रीडासंकुलासाठी कृषीविभागाचीजागामंजूर. १५ कोटी• छत्रपतीसंभाजीनगरयेथेक्रीडा विद्यापीठस्थापण्यासाठी समितीगठीत. ६५६.३८कोटी खर्चून अद्ययावत क्रीडा विद्यापीठ उभारणार• कलाग्रामच्या जागेवर एमआयडीसी आणि मनपा यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम उभारणार.• परळीत ५ कोटींचे तालुकाक्रीडासंकुलउभारणार• उदगीर तालुक्यात जळकोट येथे ५ कोटी खर्चून क्रीडासंकुलउभारणार• परभणीजिल्हाक्रीडासंकुलाचेअद्ययावतीकरणकरण्यासाठी १५कोटीस मंजुरी( पशुसंवर्धन विभाग )• मराठवड्यात दुधाची क्रांती येणार.सर्वजिल्ह्यातील८६००गावांत दुधाळ जनावरांचे वाटप.३२२५कोटी• तुळजापूर तालुक्यात शेळीसमुहयोजनाराबविण्यासाठी १० कोटी• देवणीया गोवंशीयप्रजातीच्याउच्चदर्जाचीवंशावळनिवड - ४कोटी(पर्यटन विभाग)• फर्दापूर, छत्रपतीसंभाजीनगरयेथेछत्रपतीशिवाजीमहाराजसंकल्पनाउद्यानउभारणार. प्रत्येकी ५० कोटी• उदगीर तालुक्यातील हत्तीबेटयेथेपर्यटनस्थळ- ५कोटी• अंबडयेथीलमत्स्योदरीदेवीसंस्थानाचाविकास. 40 कोटी.(सांस्कृतिक कार्य विभाग)• मराठवाड्यातील विविध स्मारके,प्रसिद्ध मंदिरांचा विकास.अंबेजोगाई, संगमेश्वर, तर, महादेव मंदिर माणकेश्वर, तेर मंदिर, महालक्ष्मी मंदिर, होट्टल मंदिर, भोग नृसिंह, गुप्तेश्वर मंदिर धाराशूर, चारठाणा मंदिर समुह, आदि. २५३ कोटी70 लाख.(महसूल विभाग)• बीड जिल्हाधिकारीइमारत उभारणार.६३.६८कोटी• वसमत येथे मॉडर्न मार्केटच्या उभारणीसाठी जागा.• लातूर येथे जिल्हाधिकारी कार्यालयाची मध्यवर्ती प्रशासकीय शासकीय इमारत.(वनविभाग)• लातूर, वडवाव, नागनाथटेकडीविकास करणार. ५.४२ कोटी• माहूरयेथेवनविश्रामगृहबांधणार.• (मदत व पुनर्वसन)• वसमत मौजे कुरुंदा येथे पूरप्रतिबंधात्मकउपाययोजना राबविण्यासाठी ३३.०३कोटी• मराठवाड्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा मजबूत करणार. प्रादेशिकआपत्तीप्रतिसादकेंद्रआणिजिल्हाआपत्तीव्यवस्थापनकेंद्राचेबळकटीकरण.५५.६९कोटीखर्च.• धारुर तालुक्यातील सुकळी या गावचे पुनर्वसन.(उद्योग विभाग)• आष्टीला कृषिपुरकक्षेत्रासाठीएमआयडीसी उभारणार. 38 कोटी• वसमत, चाकूर, वडवणी (पुसरा), मौजे सिरसाळा ता. परळी येथे एमआयडीसी स्थापन करणे.• उदगीर आणि जळकोट येथे एमआयडीसी मंजूर(कौशल्यविकासविभाग)• धाराशिवविश्वकर्मारोजगारयोजनाराबविणार(सार्वजनिक बांधकाम)• मराठवाड्यातील रस्ते सुधारणार३००कि.मी. लांबीच्यारस्त्यांचीकामे हाती घेणार. २४००कोटी• नाबार्डअर्थसहायातून मराठवाड्यात ४४कामेहाती घेणार. १०९कोटी• हायब्रिडअॅन्यूईटीयोजनेतून मराठवाड्यातील १०३०कि.मी. लांबीचे रस्ते सुधारणार. १० हजार ३००कोटी• साबरमती घाटाप्रमाणे नांदेडचा गोदावरीघाटाचे सौंदर्य खुलणार. रिव्हर फ्रंटसाठी १००कोटीखर्च• औसा तालुक्यातील मातोळा येथे तसेच कंधार तालुक्यातील मौजे कंल्हाळी येथे हुतात्म्यांचे स्मारक उभारणे.• लोहारा तालुक्यातील मौजे हिप्परगा येथे बहुउद्देशीय इमारत उभारणार.• पाटोदा येथे मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीस निधी.• बीड येथे प्रशासकीय इमारतीचे बांधकाम.• लातूर-बार्शी-टेंभुर्णी महामार्ग चार पदरी करणे.(ग्रामविकास विभाग)• मराठवाड्यातील७५ग्रामपंचायतींनाआता स्वत:चे कार्यालय मिळणार आहे. पुढील ३ वर्षात १८०कोटीदेणार. स्व. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजने अंतर्गत.• बीड येथे जिल्हापरिषदेची नवीन इमारत. ३५ कोटी.(उर्जा विभाग)• परळीऔष्णीकविद्युतकेंद्रयेथीलप्लांट्सना मंजुरी.(गृह विभाग)• नांदेडशहरात सीसीटिव्हीचे जाळे.शहर सुरक्षित होणार. १००कोटी• १८निजामकालीनपोलीसस्टेशन्सचा होणार कायापालट. ९२.८०कोटी• बीड, परळी, अंबाजोगाई येथे पोलीस हौसिंग. 300 कोटी.• छत्रपती संभाजीनगर येथील क्रांतीचौक पोलीस ठाणे इमारत आणि निवासस्थाने तसेच मिल कॉर्नर येथील निवासस्थाने. 191 कोटी 65 लाख.(परिवहन विभाग)• मराठवाड्यातील विविध शहरांतील बस स्थानकांमध्ये अमुलाग्र बदल करणार• छत्रपतीसंभाजीनगरविभागात आधुनिक ११९७ई-बसेस चालवणार . ४२१कोटीस मान्यता• छत्रपतीसंभाजीनगरविभागात वाहननिरिक्षणवपरिक्षणकेंद्रस्थापनकरणार. १३५.६१ कोटी• राज्यातील९राष्ट्रीयमहामार्गावर Intelligent Traffic Management Systemबसविणार. पुणे- छत्रपतीसंभाजीनगरमहामार्गाच्याप्रकल्पासमान्यता. १८८.१९कोटी खर्च येणार• छत्रपतीसंभाजीनगरवनांदेडयेथेस्वयंचलितचाचणीपथप्रकल्प.१०.३७ कोटी• वरील सर्व उपक्रमांना मिळून एकूण 1 हजार 128 कोटी 69 लाख निधी. (नगरविकास विभाग)• मराठवाड्यातील विविध शहरांमधील मुलभूत सोयीसुविधा विकासासाठी एकूण रुपये ६४०.२९ कोटी निधी . त्यापैकी रुपये ५३४.७४ कोटी नगरपरिषद/ नगरपंचायत क्षेत्रासाठी तर रुपये ५०५.५५ कोटी महानगरपालिका क्षेत्रासाठी मंजूर• केंद्र पुरस्कृत अमृत २.० - छत्रपती संभाजीनगर शहरासाठी रुपये २७४०.७५ कोटी किंमतीचा पाणीपुरवठा प्रकल्प रुपये २७५.६८ कोटी किंमतीचा मलनि:स्सारण प्रकल्प तर रुपये २.७८ कोटी किंमतीचा सरोवर पुनरुज्जीवनाचा प्रकल्प असे एकूण रुपये ३०५९.२१ कोटी किमतीचे प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत.• नांदेड वाघाळा महानगरपलिकेसाठी रुपये ३२९.१६ कोटी किमतीचा मलनि:स्सारण प्रकल्प• अर्धापूर नगरपंचायतेसाठी रुपये २५.१३ कोटी किंमतीचा सरोवर पुनरुज्जीवनाचा प्रकल्प• भूम नगरपरिषदेसाठी रुपये १.८३ कोटी किंमतीचा सरोवर पुनरुज्जीवनाचा प्रकल्प• माहूर नगरपरिषदेसाठी रुपये २४.६२ कोटी किंमतीचा सरोवर पुनरुज्जीवनाचा प्रकल्प• पेठ उमरी नगरपंचायतेसाठी रुपये ३.६० कोटी किंमतीचा सरोवर पुनरुज्जीवनाचा प्रकल्प• हिंगोली शहरासाठी रुपये १०४.२८ कोटी किंमतीचा रस्ते विकास प्रकल्प• औंढा नागनाथ तिर्थक्षेत्रासाठी रुपये ३६.४४ कोटी किंमतीचा पाणीपुरवठा प्रकल्प• खुलताबाद शहरासाठी रुपये २१.३२ कोटी किमतीचा पाणीपुरवठा प्रकल्प• नळदुर्ग शहरासाठी रुपये ९३.४२ कोटी किंमतीचा रस्ते विकास प्रकल्प• माजलगांव शहरासाठी रुपये ४६.५४ कोटी किंमतीचा रस्ते विकास प्रकल्प• लोहा शहरासाठी रुपये ६६.३९ कोटी किंमतीचा पाणीपुरवठा प्रकल्प• तुळजापूर तिर्थक्षेत्रासाठी रुपये १५८.५२ कोटी किंमतीचा रस्ते विकास प्रकल्प• उमरगा शहरासाठी रुपये १२६.८२ कोटी किंमतीचा रस्ते विकास प्रकल्प• अंबड शहरातील भुयारी गटार प्रकल्प रुपये १६.५६ कोटी निधी उपलब्ध करून देण्यात येईल.• जालना शहर पाणीपुरवठा प्रकल्पामध्ये ३५ MLD क्षमतेचे अंबड येथे जलशुध्दीकरण केंद्र व १५ MLDक्षमतेचे जालना येथे जलशुध्दीकरण केंद्र बांधण्यासाठी रुपये ५६.०० कोटी निधी उपलब्ध करून देण्यात येईल.• जाफराबाद शहरासाठी नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात येईल.रुपये ४७.९८ कोटी• नांदेड वाघाळा महानगरपालिका घनकचरा प्रकल्प- रुपये ८.०७ कोटी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल.• श्री. क्षेत्र परळी वैजनाथ ज्योर्तिलिंग विकास आराखडा- रुपये २८६.६८ निधी उपलब्ध करुन देण्यात येईल.• औंढा नागनाथ विकास आराखडा रुपये ५० कोटी निधी उपलब्ध करून देण्यात येईल.• मराठवाड्यातील विविध शहरांमधील मुलभूत सोयीसुविधा विकासासाठी एकूण रुपये ६४०.२९ कोटी निधी . त्यापैकी रुपये ५३४.७४ कोटी नगरपरिषद/ नगरपंचायत क्षेत्रासाठी तर रुपये ५०५.५५ कोटी महानगरपालिका क्षेत्रासाठी मंजूर• परभणी शहराची रुपये १५७.११ कोटी किंमतीची समांतर पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात येईल.• परभणी शहराची रुपये ४०८.८३ कोटी किंमतीचा मलनि:स्सारण प्रकल्प मंजूर करण्यात येईल.• लातूर रस्ते विकास प्रकल्प रुपये ४१.३६ कोटी मंजूर करण्यात येईल.• नाट्यगृहाचे उर्वरित बांधकाम पूर्ण करण्याकरिता लातूर महानगरपालिकेस रुपये २६.२१ कोटी व परभणी महानगरपालिकेस रुपये ११.७५ कोटी निधी मंजूर करण्यात येईल.• उदगीर नगरपरिषदेस नाट्यगृहाच्या बांधकामासाठी रुपये १२ कोटी निधी मंजूर करण्यात येईल.• उदगीर शहरात भूमीगत गटार यंत्रणा.• नांदेड वाघाळा महानगरपालिका क्षेत्रातील कार्यान्वीत असलेल्या घनकचरा प्रकल्प व प्रगतीपथावर असलेल्या बायोगॅस प्रकल्पासाठी रुपये ८.०७ कोटी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल.(माहितीवतंत्रज्ञानसंचालनालय)• मराठवाड्यात ४३२ग्रामपंचायतीनाभारतनेटजोडणीवर्षभरात देणार. २८६ कोटी.• छत्रपती संभाजीनगर व नांदेड येथे विद्यापीठ परिसरात मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यासाठी माहिती संग्रहालय. (रोजगार हमी योजना)• मराठवाड्यात 4 लाख विहिरींचा कार्यक्रम राबविणार. (कृषी विभाग)• आता मराठवाड्यातीलशेतकऱ्यांसाठीबीड येथे सीताफळआणिइतरफळांवरप्रक्रियाउद्योग. ५ कोटी• हळद संशोधनास आता वेग येणार. हिंगोलीतील हरिद्रा संशोधन केंद्रासाठी १०० कोटी.• अंबाजोगाई येथील शासकीय कृषी महाविद्यालयात मुलामुलींचे वसतीगृह सुरु.105 कोटी.(सार्वजनिक आरोग्य विभाग)• अहमदपूर, चाकूर, माजलगाव येथे ट्रॉमा केअर सेंटर, धारुर तालुक्यातील तेलगाव तसेच वडवली येथे ग्रामीण रुग्णालयास निधी, किनगाव ग्रामीण रुग्णालय बांधकाम. एकूण निधी 374 कोटी 91 लाख.(मृद व जलसंधारण)• अहमदपूर तालुक्यातील मानार नदीवर 9 कोल्हापुरी बंधारे. पाटोदा तालुक्यातील रोहतवाडी आणि उंबर विहिरा साठवण तलाव, आष्टी आणि शिरुर तालुक्यात कोल्हापूर बंधाऱ्यांचे लातूर टाईप बॅरेजमध्ये रुपांतर आणि गंगाखेड तालुक्यातील मासोळी, घळाटी, टोकवाडी आणि पोखर्णी नदीवर सिमेंट नाले बंधारे.(अल्पसंख्याक विकास)• अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी परदेशात पदव्युत्तर पदवी व पीएचडी अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती.• छत्रपती संभाजीनगर येथे अल्पसंख्याक आयुक्तालय व जिल्हा स्तरावर स्वतंत्र कार्यालय.• डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेच्या अनुदानात वाढ. तसेच पारंपारिक शिक्षणाबरोबर बोर्डाच्या शालेय अभ्यासक्रमाचे शिक्षण देणारे मदरसांचे अनुदान 2 लाखावरुन 10 लाख करणे.इतरही घोषणा:परळी वैजनाथ विकास आराखड्यात आयुर्वेद पार्कचा समावेश, वेरूळ येथे शहाजी राजे भोसले यांचे स्मारक .......... read more 10 2196 views 0 comment 1 Shares Sandeep , Nanded 14/09/2023 11:09 AM Edit Delete करडखेड जलशुद्धीकरण केंद्र येथील स्टार्टर मध्ये बिघाड झाला असल्याने आज दिनांक १२ सप्टेंबर २०२३ रोजी *देगाव रोड, मुकुंद नगर, जय भीम नगर, गोकुळ नगर, भोई गल्ली, चमकूमडी, सराफा लाईन* या भागात उद्या सकाळी 6:00 वाजता पाणी पुरवठा करण्यात येईल. याची नोंद घ्यावी. *विद्युत पुरवठा खंडित झाल्यास यात बदल होवू शकतो**पाणी पुरवठा विभागास सहकार्य करावे* .......... read more 0 0 views 0 comment 1 Shares Sandeep , Nanded 14/09/2023 07:09 AM Edit Delete *आयुष्यमान भव: मोहिमेचा जिल्हा पातळीवर शुभारंभ* ▪️अंगणवाडी ते 18 वयोवर्ष गटातील बालक व विद्यार्थ्यांची होणार मोफत तपासणी▪️संदर्भीत रुग्णांवर होणार मोफत उपचार▪️माता सुरक्षित घर सुरक्षित अभियांतर्गत महिलांच्या पाठोपाठ आता पुरूषांची होणार तपासणी नांदेड, :-स्वत:च्या स्वच्छतेसह परिसराच्या स्वच्छतेत निरोगी आयुष्याचा मंत्र दडलेला आहे. बरेचसे आजार हे संसर्गजन्य व अस्वच्छतेतून जन्माला येतात. याचबरोबर असंसर्गजन्य रोग हे व्यक्तीपरत्वे आढळून येतात. प्रत्येकाच्या निरोगी आयुष्यासाठी केंद्र शासनाची आयुष्यमान भव: ही मोहिम अत्यंत गरजेची असून संपूर्ण जिल्हाभर गाव पातळीपर्यंत अत्यंत प्रभावीपणे राबविण्यासाठी आरोग्य विभागासह संबंधित यंत्रणेने जबाबदारीने काम करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी केले. संपूर्ण देशभर आयुष्यमान भव: मोहिमेचा शुभारंभ केंद्र शासनस्तरावर महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर राज्यपातळीवरील या मोहिमेचे उद्घाटन ऑनलाईन कार्यक्रमाद्वारे महाराष्ट्राचे राज्यपाल महामहीम रमेश बैस यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा पातळीवरील या मोहिमेचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या हस्ते श्री गुरूगोबिंदसिंघजी जिल्हा रुग्णालय नांदेड येथे करण्यात आला. जिल्हा पातळीवरील कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय पेरके, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुरेशसिंह बिसेन आदी उपस्थित होते. यावेळी टीबी कार्यक्रमात उत्कृष्ट कामकाज केल्याबद्दल मुख्य कार्यकारी मीनल करनवाल यांच्या हस्ते निक्षय मित्र विवेक माधव खरात, गिरीष रमेशराव देशपांडे, शरद संभाजीराव पवार तसेच टी. बी. चाम्पीयन, हरिदास बळीराम वाघमारे, शेख मोहम्मद गऊस शेख रहीम यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर उपस्थित सर्वांनी अवयवदानाची शपथ घेतली. स्वतः मीनल करनवाल यांनी अवयवदानाचा फॉर्म भरून अवयवदान करण्याचा संकल्प केला. 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत आयुष्यमान भव: मोहिम राबवली जाणार आहे. सदर मोहिमेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांचे आयुष्यमान कार्डची नोंदणी व वितरण केले जाणार आहे. तसेच सर्व आरोग्य संस्थामध्ये, शाळा, महाविद्यालय येथे स्वछता मोहीम राबविली जाईल. आरोग्य वर्धिनी केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा, ग्रामीण रुग्णालय स्तरावर आयुष्यमान मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शनिवारी असंसर्गजन्य रोग आणि दुसऱ्या आठवड्यात क्षयरोग, कुष्टरोग व इतर संसर्गजन्य आजारा बाबत तपासणी, निदान व उपचार केले जाणार आहेत. तिसऱ्या आठवड्यात माता, बाल आरोग्य व पोषण आरोग्य सुविधा दिल्या जाणार आहेत. चौथ्या आठवड्यात सिकलसेल तपासणी व नेत्ररोग चिकित्सा, कान-नाक व घसा तपासणी सुविधा दिल्या जातील. याचबरोबर सर्वांनी अवयवदान करण्यासाठी मोठ्याप्रमाणावर आवाहन केले जाईल. रक्तदान शिबीरही प्रत्येक तालुक्यात शासकीय दवाखाण्यात घेतले जाणार आहे. शुन्य ते 18 वय वर्ष वयोगटातील मुलांची तपासणी अंगणवाडी व प्राथमिक शाळांमध्ये ४Ds’- (Defects at birth, Development Delays, Deficiencies and Diseases) करिता केली जाणार आहे. 18 वर्ष वयोगटाच्या पुढील व्यक्तींनाच्या विविध तपासण्या केल्या जाणार आहेत. 2 ऑक्टोबर रोजी समुदाय आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत गाव पातळीवर आयुष्यमान सभेचे आयोजन केले आहे. या मोहिमेत आयुष्यमान कार्ड, आयुष्यमान गोल्ड कार्ड याचे वितरण केले जाईल, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी सांगितले. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय पेरके, एनसीडी नोडल अधिकारी डॉ. हणमंत पाटील, डॉ. एच. के. साखरे, आर.एम.ओ. डॉ. झिने, डॉ. अर्चना तिवारी, मेट्रन सुरेखा जाधव, कार्यक्रम समन्वयक डॉ. उमेश मुंडे, जिल्हा सल्लागार डॉ. साईप्रसाद शिंदे, डॉ. गुडे, डॉ. ज्ञानेश्वर पवार, अनिल कांबळे, प्रकाश आहेर, विठ्ठल तावडे, नागोराव अटकोरे, विठ्ठल कदम, अब्दुल गनी, श्री कंधारे तसेच कार्यालयीन अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. .......... read more 1 20 1976 views 0 comment 1 Shares Sandeep , Nanded 05/09/2023 08:09 AM Edit Delete *नांदेड येथे जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे सर, अपर जिल्हा पोलीस अधीक्षक मा. अबिनाश कुमार सर यांची सदिच्छा भेट घेतली व त्यांचा येरगी येथील चालुक्य कालीन सरस्वती मातेची प्रतिमा व येरगी कॉफी टेबल बुक देऊन सत्कार केला. यावेळी मा. श्री धरणे सर, अपर पोलीस अधीक्षक भोकर,मा. गौहर हसन सर, ASP अर्धापूर* डॉ. जगताप मॅडम home dysp नांदेड, मा. पोलीस निरीक्षक श्री टाक सर, मा. श्री धोंडगे सर, राखीव पोलीस निरीक्षक पोलीस मुख्यालय नांदेड,राष्ट्रपती पुरस्कार मिळालेले क्राईम ब्रंच से हेड द्वारकादास चिखलीकर उपस्थित होते. या वेळ भाजपा जिल्हाउपाध्यक्ष तथा सरपंच संतोष पाटील, व ग्रामसेवक राजेश तोटावाड,* .......... read more 1 14 1452 views 0 comment 1 Shares Sandeep , Nanded 03/09/2023 10:09 PM Edit Delete *राष्ट्रीय पत्रकार संघ भारत संघटनेच्या नांदेड जिल्हाध्यक्ष पदी इर्शाद पटेल..* देगलूर .. राज्यभर एकजूट असलेल्या राष्ट्रीय पत्रकार संघ भारत या संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी नव्याने इर्शाद पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विविध वर्तमान पत्रात लिखाण करणारे वार्ताहर, सोशल मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता करणारे बातमीदार, प्रतिनिधी ज्येष्ठ पत्रकार, उच्च दर्जाचे सेवानिवृत्त अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली देगलूर तालुक्यांत राष्ट्रीय पत्रकार संघ भारत ही संघटना अल्पावधीत लोकप्रिय झाली आहे. विविध वर्तमान पत्राचे संपादक, प्रतिनिधी या संघटनेला जोडत आहेत. यासाठी काही दिवसापूर्वी कार्यकारणी जाहीर झाली होती. नुकताच संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप भालेराव यांच्या उपस्थितीत कार्यकारणीत फेर बदल होऊन प्रा. इर्शाद पटेल यांची नव्याने संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर राज्य कार्यकारिणी सदस्य पदी पवन महाराज वैष्णव यांची निवड करण्यात आली. सोबतच सदस्यपदी कार्यरत असलेले अमोल शिंदे यांची तालुका संपर्क प्रमुख पदी, मारोती कुडकेवार जिल्हा संपर्क प्रमुख पदी, पिराजी इबितवार शहापूरकर यांची तालुका सदस्यपदी, तसेच धम्मानंद सोनाळकर यांची तालुका सदस्यपदी एकमताने निवड करून सत्कार करण्यात आले व भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष संदीप भालेराव राष्ट्रीय पत्रकार संघ भारत महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष यांनी भूषविले. राज्य कार्यकारिणी सदस्य पवन महाराज वैष्णव, संघटनेचे देगलूर तालुका अध्यक्ष योगेश जी. जाकरे, जिल्हा सहसचिव अनिल पवार, जिल्हा संपर्क प्रमुख मारोती कुडकेवार, जिल्हा संघटक प्रकाश गवलवाड, लक्ष्मण पवार, सुभाष वाघमारे, शेखर पंतुलवार, अमोल शिंदे यासह आदी संघटनेतील पदाधिकाऱ्यांची उपस्थीती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश जाकरे यांनी केले तर प्रास्ताविक शशिकांत पटणे यांनी मांडले, आभार सुभाष वाघमारे यांनी व्यक्त केले. नव नियुक्त सर्व पदाधिऱ्यांना शुभेच्छा व्यक्त करण्यात आले. .......... read more 1 26 311 views 0 comment 1 Shares Sandeep , Nanded 30/08/2023 06:08 PM Edit Delete *गणेशोत्सव स्पर्धेत जास्तीत जास्त मंडळांनी* *15 सप्टेंबरपर्यंत सहभाग नोंदवावा**सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन* मुंबई, दि. ३० : राज्य शासनाने १९ सप्टेंबर २०२३ पासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवात राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त मंडळांनी १५ सप्टेंबर २०२३ पर्यंत आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. या स्पर्धेसाठी मुंबई, मुंबई उपनगर, पुणे, ठाणे या जिल्ह्यांतून प्रत्येकी ३ व अन्य जिल्ह्यांतून प्रत्येकी एक या प्रमाणे उत्कृष्ट ४४ गणेशोत्सव मंडळांची निवड करण्यात येईल. या ४४ गणेशोत्सव मंडळांमधून राज्यातील पहिल्या क्रमांकाच्या उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळास पाच लाख रुपयांचे, द्वितीय क्रमांकास अडीच लाख रुपयांचे, तर तृतीय क्रमांकास एक लाख रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल. उर्वरित ४१ गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून प्रत्येकी २५ हजार रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात येईल. उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेचे वेळापत्रक उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेत सहभागी होण्यासाठी गणेश मंडळांना 15 सप्टेंबर 2023 पर्यंत स्पर्धेत अर्ज करता येईल. mahotsav.plda.@gmail.com या ई - मेलवर गणेशमंडळांनी अर्ज करावा. पु. ल. देशपांडे कला अकादमी तर्फे ई-मेलवर प्राप्त अर्ज संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाला १८ सप्टेंबरपर्यंत परीक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात येईल. १९ ते २८ सप्टेंबर दरम्यान जिल्हास्तरीय समितीचे सदस्य स्पर्धेत सहभागी गणेशोत्सव मंडळांचे प्रत्यक्ष भेटी देऊन परीक्षण करतील. व्हिडिओग्राफी आणि कागदपत्रे तपासून अभिप्रायासह गुणांकन करतील. जिल्हास्तरीय समिती जिल्ह्यातून एका उत्कृष्ट गणेश मंडळाची शिफारस १ ऑक्टोबरपर्यंत पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीला करेल. राज्यस्तरीय समिती राज्यातील उत्कृष्ट ३ गणेश मंडळाची शिफारस अकादमीला करेल. त्यानुसार कला अकादमी विजेत्या मंडळांची घोषणा करेल व १२ ऑक्टोबरला विजेत्या गणेश मंडळांना पुरस्कार प्रदान करण्यात येईल. राज्य शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या ४ जुलै २०२३ रोजीच्या शासन निर्णयात स्पर्धेचा तपशील, स्पर्धा निवडीचे निकष नमूद केले आहेत. तसेच अर्जही उपलब्ध करून देण्यात आला आहे. अर्जाच्या या नमुन्यानुसार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पु. ल. देशपांडे, महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या mahotsav.plda@gmail.com या ई- मेल १५ सप्टेंबर २०२३ पर्यंत अर्ज करावा. या स्पर्धेत जास्तीत जास्त मंडळांनी सहभाग नोंदवावा, असेही आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी केले आहे. .......... read more 3 1922 views 0 comment 1 Shares Sandeep , Nanded 27/08/2023 05:08 PM Edit Delete नांदेड केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोशियन तर्फे ज्येष्ठ केमिस्ट श्री. उमाकांतराव बापूराव भालेराव देगलूर यांचा सन्मान करण्यात आला . शेअर्स चे डी मॅट चे खाते काढण्याचा उपक्रम संघटनेतर्फे राबवियात आला त्याप्रसंगी औषध क्षेत्रातील तीन पिढ्या जनतेच्या सेवेत असलेले भारत मेडीकल स्टो. चे सर्वेसर्वा "श्री. उमाकांतराव बापूराव भालेराव " यांचा सत्कार केमिस्ट बांधवाकडून करण्यात आला.केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे नांदेड जिल्हा अध्यक्ष शंतनू कोडगिरे, जिल्हा संघटक सचीव दिलीप पावडे,जिल्हा सहसचिव नितीन गंजेवार, राष्ट्रीय पत्रकार संघ भारत संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा स्टार 24 तास चे मुख्य संपादक संदीप भालेराव व केमिस्ट उपास्थित होते . .......... read more 1 177 8135 views 0 comment 0 Shares Sandeep , Nanded 27/08/2023 10:08 AM Edit Delete देगलूर बसस्थानकामध्ये पोलीस चौकी उभारण्यासाठी हालचाली सुरू शिवसेना शहर सचिव धनाजी जोशी यांच्या कार्याला यशबसस्थानकातील पाण्याची टाकी पाडुन त्याठिकाणी लवकरच पोलिस चौकी उभारू असे आश्वासन आगार प्रमुखांनी देगलूर शिवसेना शहर सचिव धनाजी जोशी यांना ग्वाही दिली होतीनागरिकांतून होत आहे धनाजी जोशी यांच्या कार्याचा गौरव मागिल महिन्यात देगलूर शिवसेना शहर सचिव धनाजी जोशी यांनी शिष्टमंडळा सहित आगार प्रमुख अमर पाटील साहेब यांना बसस्थानकामध्ये लांब पल्ल्याच्या गाड्या सोडुन जुन्या व नव्या बसस्थानकामध्ये पोलिस चौकी उभारावे यासाठी निवेदनाद्वारे मागणी करुन अमरण उपोषणाचा इशारा दिला होता तसेच उपजिल्हाधिकारी कुलदीप जंगम साहेब व नायब तहसीलदार नेटके साहेब यांना हि परिस्थिती वाचुन दाखवली होती उपजिल्हाधिकारी साहेब यांनी लक्ष घालून संबंधित विभागास योग्य ती कारवाई साठी पाचारण केले होते त्यामुळे बसस्थानकातील संबंधित अधिकारी यांनी मोडकळीस आलेल्या पाण्याची टाकी पाडली असुन लवकरच त्याठिकाणी पोलिस चौकी उभारू असे देगलूर शिवसेना शहर सचिव धनाजी जोशी यांन कळविले होते या कामाचे सुरवात झाले असून आज प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली असून मोडकळीस आलेल्या पाण्याची टाकी पाडुन जमिनदोस्त करण्यात आली आज त्याठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून त्यासाठी सुरू असलेल्या कामाबद्दल आगार प्रमुख अमर पाटील यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्याया कार्याबद्दल समस्त देगलूरकरांन कडुन देगलूर शिवसेना शहर सचिव धनाजी जोशी यांना केलेल्या कामाबद्दल गौरव केला जात आहे... .......... read more 1 58 9764 views 0 comment 1 Shares Sandeep , Nanded 26/08/2023 10:08 PM Edit Delete *उप मुख्यमंत्री अजित पवार यांचा नांदेड दौरा कार्यक्रम* नांदेड ) दि. 26 :- महाराष्ट्र राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. रविवार 27 ऑगस्ट 2023 रोजी बारामती विमानतळ येथून विमानाने सकाळी 10.25 वाजता नांदेड विमानतळ येथे आगमन. सकाळी 10.40 वाजता हेलिकॉप्टरने पोलीस परेड मैदान हेलिपॅड परभणीकडे प्रयाण. पोलीस परेड हेलिपॅड परभणी येथून हेलिकॉप्टरने दुपारी 2.45 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व राखीव. दुपारी 3.15 वाजता हेलिकॉप्टरने पोलीस मुख्यालय हेलिपॅड बीडकडे प्रयाण करतील. .......... read more 22 2471 views 0 comment 1 Shares Sandeep , Nanded 26/08/2023 03:08 PM Edit Delete *मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नांदेड दौरा कार्यक्रम* नांदेड दि. 26 :- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. रविवार 27 ऑगस्ट 2023 रोजी मुंबई विमानतळ येथून शासकीय विमानाने सकाळी 10.35 वाजता नांदेड विमानतळ येथे आगमन व हेलिकॉप्टरने पोलीस परेड हेलिपॅड परभणीकडे ते प्रयाण करतील. पोलीस परेड हेलिपॅड परभणी येथून हेलिकॉप्टरने दुपारी 2.45 वा. नांदेड विमानतळ येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आगमन व शासकीय विमानाने मुंबईकडे ते प्रयाण करतील. .......... read more 1 33 2808 views 0 comment 1 Shares Sandeep , Nanded 21/08/2023 04:08 PM Edit Delete देगलूर येथील प्रसिद्ध डॉ . जे. आय . भूमे 33 वर्षापासून वैदयकिय क्षेत्रात कार्यरत आहेत . त्यांच्या मुलाला (डॉ. राहुल भुमे ) यांना भेटण्यासाठी इंग्लंडला गेले होते .येथून परत येताना त्यांच्या अनुभवातून आपण डॉक्टर असल्याचा स्वाभिमान त्यांना वाटला . हा किस्सा त्यांनी शेअर केला. . . ."डॉक्टर असल्याचा अभिमान"इंग्लंडमध्ये काम करत असलेल्या माझा मुलगा डॉक्टर राहुल भूमे यास भेटून दिनांक 8 ऑगस्ट रोजी रात्री पावणे दहा वाजता लंडन ते हैदराबाद दिल्ली मार्गे एअर इंडियाच्या विमानात बसलो, साधारण दहा तासाचा प्रवास असल्यामुळे सर्वजण जेवण करून डुलक्या घेऊ लागलेसाधारण आठ तासाचा प्रवास झाल्यानंतर भारतीय वेळेनुसार सकाळी सव्वा सात वाजेच्या दरम्यान विमानामध्ये अनाउन्समेंट ऐकून मी जागा झालो " कोणी डॉक्टर आहेत का? एका प्रवाशाला चक्कर येत आहे व त्यांना मदत पाहिजे आहे" असा मतितार्थ त्या अनाउन्समेंट चा होतामी खडबडून जागा होऊन लगेच त्या सहप्रवाशापाशी पोहोचलो व त्यांची तपासणी केली असता नाडी मंद लागत होती, सहप्रवासी गुंगीत दिसत होताआठ तासाचा प्रवास करून एकसारखे बसून व अर्धवट झोपेमुळे बहुतेक त्यांना चक्कर आली असावी असा माझा ओपिनियन झाले व मी त्यांना लगेच खाली जमिनीवर आडवे पडण्याचा सल्ला दिला व सर्व हवाई सुंदरी सह त्यांना जमिनीवर आडवे झोपवलेथोड्या वेळानंतर त्यांना जमिनीवरून मागील मोकळ्या खुर्चीवर झोपवण्याचा प्रयत्न मध्ये पुन्हा एकदा त्या प्रवाशाला चक्कर आली व कपड्यांमध्ये लघवी झाली त्यांना उचलून रिकाम्या तीन खुर्च्यावर झोपवल्यानंतर थोड्या वेळात त्यांना शुद्ध आली, त्यांना थोडेसे साखरेचे पाणी पाजले पुढील दोन तास मी त्यांना वारंवार तपासणी करून धीर दिला व दिल्लीला उतरल्यानंतर दवाखान्यात दाखवण्याचा सल्ला दिलात्या प्रवाशाच्या वैद्यकीय इतिहास मध्ये कसलाच आजार नव्हता, वय साधारण 65 वर्षाचे व रात्रभराच्या बसून प्रवासामुळे बहुदा चक्कर आली असावीया मित्रासोबत नंतर बोलणे झाले व त्यात त्यांना तपासणीमध्ये कसला आजार आहे का याची खातरजमा होत आहे असे समजले डॉक्टर म्हणून आज पर्यंत गेल्या 33 वर्षापासून मी देगलूरला वैद्यकीय व्यवसाय करत आहे, खूप अनुभव आले, काही चांगले, काही वाईट लंडन ते हैदराबाद मार्ग दिल्ली विमानातील या अनुभवातून डॉक्टर असल्याचा अभिमान वाटला .डॉ. जे. आय. भूमे देगलूर .......... read more 1