अंबरनाथ : उलन चाळ गटारकाम बंद, पावसाळ्यात पाणी साचण्याची समस्या
अंबरनाथ : उलन चाळ येथील गटारकाम खूप दिवसांपासून बंद आहे. अंबरनाथ नगर परिषदेच्या कामकाजामुळे गटार कामकाज फार हळू होत आहे. एक महिन्यांपेक्षा जास्त काळ झाले तरी गटार पूर्ण करण्यात आलेले नाही, फक्त खोदकाम झाले आहे.
स्थानिकांना गटारात पडून जखमी होण्याची भीती वाटते. पावसाळा जवळ येत असल्याने या भागात पाणी साचण्याची समस्या गंभीर होत आहे, ज्यामुळे नागरिकांची अस्वस्थता वाढली आहे.