logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

सूर्यकांत शर्मांच्या वक्तव्यावर तरुणांमध्ये कामाविषयी चर्चा - लक्षवेधक

संपूर्ण देशातील तरुणांमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सूर्यकांत शर्मा यांच्या वक्तव्यामुळे कामाविषयी प्रश्न निर्माण झाला आहे. तरुणांमध्ये “तरुणांच्या हाताला खरंच काम नाही का?” हा विचार चर्चेचा विषय ठरला आहे. हा प्रश्न फक्त सरकार किंवा राजकीय यंत्रणेवर टाकून संपत नाही, कारण वास्तव अधिक खोल आहे.

आजही अनेक घरांमध्ये "काम नाही" असा वाक्य ऐकू येतो, पण खरंच काम नाही का किंवा कामाच्या अर्थालाच मर्यादित करून पाहिलं जातंय का, हे महत्वाचं आहे. तरुण शिक्षण घेत आहेत, कौशल्य मिळवत आहेत; मात्र त्यांची प्रगती मुख्यत्वे शहरापुरतीच मर्यादित आहे. त्यामुळे गाव, शेती, बागायत, ग्रामीण उद्योग यांकडे दुर्लक्ष होत आहे. गावांमध्ये शेती, बागायत, प्रक्रिया उद्योग, दुग्धव्यवसाय, मत्स्यव्यवसाय, ग्रामीण पर्यटन, हस्तकला, डिजिटल सेवा अशा अनेक संधी असूनही कामासाठी माणसांची कमतरता आहे.

शेतीला उद्योगाचा दर्जा देणे, शेतकऱ्यांना आर्थिक व्यवस्थापन, बाजारपेठ आणि आधुनिक तंत्रज्ञान यांची जोड देणे आवश्यक आहे. सरकारने ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देणारी धोरणं राबवून पायाभूत सुविधा निर्माण करणे आवश्यक आहे. देशाचा विकास शहरांपुरता मर्यादित न ठेवता गाव आणि शहर यांच्या समतोल प्रगतीवर भर देणे गरजेचे आहे, तसेच तरुणांनी कामाकडे दृष्टी बदलणे आवश्यक आहे.

4
103 views

Comment