logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

भिवंडीच्या विकासासाठी आक्रमक; लोकप्रतिनिधींची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा

भिवंडी लोकसभा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी आणि प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान भिवंडीतील पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली असून, मुख्यमंत्र्यांकडे महत्त्वाच्या मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
प्रमुख मागण्या आणि चर्चेतील मुद्दे:
लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची जनभावना लक्षात घेता, त्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती करण्यात आली.
मुरबाड रेल्वे प्रकल्प: लोकसभा मतदारसंघाच्या दळणवळणासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासनाने ५०% निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.
आरोग्य व शिक्षण: भिवंडीतील वाढती लोकसंख्या पाहता शहरात अत्याधुनिक वैद्यकीय महाविद्यालय (मेडिकल कॉलेज) उभारणे, शाळांना 'स्मार्ट स्कूल' करणे, शिक्षकांची रिक्त पदे भरणे आणि मोडकळीस आलेल्या शाळांच्या दुरुस्तीला गती देण्याबाबत चर्चा झाली.
पाणीपुरवठा व रस्ते: भावली धरणाच्या टॅपिंगद्वारे स्थानिक पाणीप्रश्न सोडवणे, वराळदेवी तलावाच्या सुशोभीकरणासाठी २०% राज्य निधी मिळवणे आणि तुंगारेश्वर येथील पूज्य सदानंद महाराजांच्या मठाकडे जाणारा रस्ता विकसित करण्यावर भर देण्यात आला.
शेतकरी व पर्यावरण: विरार-अलिबाग कॉरिडॉरमुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य आणि वाढीव मोबदला मिळावा, तसेच भिवंडीतील ५०० कोटी खर्चाच्या घन कचरा व्यवस्थापन (Solid Waste Management) प्रकल्पाला आर्थिक सहकार्य मिळावे, अशी आग्रही मागणी करण्यात आली.
जनतेच्या प्रश्नांसाठी पाठपुरावा सुरूच राहणार
"भिवंडी लोकसभा क्षेत्राच्या विकासासाठी मी कटिबद्ध आहे. नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू असून, संबंधित सर्व प्रलंबित विषयांवर योग्य निर्णय व्हावेत यासाठी मी आग्रही आहे," असा विश्वास यावेळी लोकप्रतिनिधींनी व्यक्त केला.

14
1356 views

Comment