मालेगांव: ग्रामीण रुग्णालयात रूग्णांची गैरसोय, अधिकारी गैरहजर
मालेगांव: ग्रामीण रुग्णालयात रूग्णांना आवश्यक सेवा न मिळाल्याने गंभीर गैरसोय उभी राहिली आहे. या रुग्णालयात कार्यरत अधिकारी देखील गैरहजर असल्याची तक्रार उभी राहिली आहे. प्रशासनाने या संदर्भात योग्य नियोजन व आंमलबजावणी न केल्याने रुग्णालयातील सेवा प्रणाली ठप्प झाल्याचे दिसून येते.
तक्रारीनुसार, भारत सरकारकडून दिल्या जाणाऱ्या पगार व खर्चाचा योग्य वापर होत नसल्याची शंका व्यक्त करण्यात आली आहे. या अधिकार्यांवर कडक कार्यवाही होणे आवश्यक असल्याचे स्थानिकांनी मागणी केली आहे. या समस्यांमुळे रुग्णांच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होत असून तत्काळ उपाययोजना अपेक्षित आहे.