ग्रामसभेत ग्रामसेवकांसह सरपंच यांनी काढला पळ
भंडारदरा: भंडारदरा ग्रामपंचायत कार्यान्वित आदर्श गाव भेटीच्या नावाखाली कोकण दर्शनाला गेलेल्या विषयावर आज ग्रामसभेत प्रश्न उपस्थित करण्यात आले. तरुणांनी सहलीचा खर्च आणि कोणत्याही आदर्श गावाला भेट दिली का याबाबत प्रश्न विचारले असता, ग्रामपंचायत कडून कोणतेही स्पष्ट उत्तर मिळाले नाही.
यामुळे ग्रामसभेतील सर्व ग्रामस्थ आक्रमक झाले. ग्रामसेवक, सरपंच आणि कर्मचारी यांनी अर्धवट ग्रामसभा सोडून पळ काढल्याने संपूर्ण तालुक्यात या घटनेची चर्चा रंगली आहे.