भारताकडून बांगलादेशला 5000 टन डिझेल पुरवठा...
युद्धामुळे जगावर इंधन संकट; तरीही भारताकडून बांगलादेशला 5000 टन डिझेल पुरवठा
मध्यपूर्वेतील युद्धपरिस्थितीमुळे जागतिक स्तरावर इंधन तुटवड्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीतही भारताने बांगलादेशला 5000 टन डिझेल पुरवण्याचा निर्णय घेतला आहे.
बांगलादेश पेट्रोलियम कॉर्पोरेशनच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, 'बांगलादेश-भारत मैत्री वाहिनी' पाइपलाईनद्वारे आसाममधील नुमालीगढ रिफायनरी लिमिटेड येथून वायव्य दिनाजपूरमधील डेपोपर्यंत डिझेलचा पुरवठा सुरू करण्यात आला आहे. यामुळे दोन्ही देशांतील ऊर्जा सहकार्य आणि मैत्रीपूर्ण संबंध अधोरेखित होत आहेत.पण यामुळे भारतीय जनता त्रस्त आहे युद्ध परिस्थिती मुळे तेलाचे भाववाढ व कमतरता भासू शकते अशी जनतेच्या मनात मत मतांत्रे आहेत