logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

वर्धा पोलीस प्रशासनाच्या मनमानी विरोधात विक्की सवाई यांचा एल्गार; माहितीच्या अधिकाराखाली (RTI) मागितला हिशोब!



दिनांक: १० मार्च २०२६

स्थळ: वर्धा

वर्धा: जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात एका पोलीस कर्मचाऱ्याने केलेली मारहाण आणि त्यानंतर कायदेशीर प्रक्रियेचा गळा घोटणाऱ्या पोलीस प्रशासनाविरोधात सामाजिक कार्यकर्ते आणि 'वीर अशोक सम्राट संघटने'चे संस्थापक अध्यक्ष श्री. विक्की महेंद्र सवाई यांनी आता कायदेशीर लढाई तीव्र केली आहे. त्यांनी माहितीचा अधिकार कायदा २००५ (RTI) अंतर्गत पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे १० प्रमुख मुद्द्यांवर सविस्तर माहिती आणि पुराव्यांची मागणी केली आहे.

काय आहे प्रकरण? १८ फेब्रुवारी २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, वर्धा येथे पोलीस कॉन्स्टेबल क्षितिज अशोकराव रोकडे (बकल नं. २२६) यांनी विक्की सवाई यांना धमकी देऊन त्यांचा मोबाईल हिसकावून घेतला व मारहाण केली. या घटनेनंतर विक्की सवाई यांनी तत्काळ मा. पोलीस अधीक्षक, वर्धा यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलीस अधीक्षकांना दिलेल्या त्याच तक्रारीची प्रत घेऊन ते वर्धा शहर पोलीस ठाण्यात पक्की FIR नोंदवण्यासाठी गेले. मात्र, पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केलेली असतानाही, वर्धा शहर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी "वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आदेश नाहीत" असे सांगून FIR नोंदवण्यास स्पष्ट नकार दिला. धक्कादायक बाब म्हणजे, तक्रारदारालाच तासन् तास पोलीस ठाण्यात बसवून ठेवले आणि त्यांच्यावरच गुन्हा दाखल करण्याचा अजब प्रकार केला.

RTI अर्जातील प्रमुख मागण्या: विक्की सवाई यांनी आपल्या अर्जात सर्वोच्च न्यायालयाच्या 'ललिता कुमारी विरुद्ध उत्तर प्रदेश शासन' या ऐतिहासिक निकालाचा दाखला दिला आहे. त्यांनी अर्जात खालील पुराव्यांची मागणी केली आहे:

१. घटनेच्या दिवसाचे जिल्हाधिकारी कार्यालयाचे CCTV फुटेज (CD/Pen Drive मध्ये). २. पोलीस अधीक्षकांना दिलेल्या तक्रारीवर झालेली कार्यालयीन नोंद (Inward Entry).

३. तक्रार नोंदवण्यास नकार देणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध झालेली चौकशी.

४. तक्रारदाराला दिलेली वागणूक आणि स्टेशन डायरीमधील त्या वेळच्या नोंदी.

"रक्षकच जेव्हा भक्षक बनतात, तेव्हा लोकशाही धोक्यात येते" यावेळी बोलताना विक्की सवाई म्हणाले की, "मी स्वतः पोलीस अधीक्षकांकडे तक्रार देऊनही शहर पोलिसांनी माझी दखल घेतली नाही, उलट मलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. हा कायद्याचा उघड अवमान आहे. कलम ७(१) नुसार ही माहिती माझ्या वैयक्तिक स्वातंत्र्याशी संबंधित असल्याने ती मला ४८ तासांत मिळणे अपेक्षित आहे. न्याय मिळेपर्यंत माझा हा लढा थांबणार नाही."

आपला नम्र, (विक्की महेंद्र सवाई) संस्थापक अध्यक्ष, वीर अशोक सम्राट संघटना, वर्धा

संपर्क: ९४२२३५९६५७

20
11 views

Comment