प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त श्री भागवत कथा ज्ञानयज सोहळा आळंदी ग्रामस्थ कुऱ्हाडे परिवार
येथे प्रथम पुण्यस्मरणानिमित्त श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा; कीर्तन-भजनांनी भक्तिमय वातावरण
आळंदी (पुणे) :
कै. गं. भा. विमल (काकू) गोपाळ पाटील कुन्हाडे (मा. चेअरमन, विवि. का. सो. आळंदी) यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आळंदी देवाची येथे संगीत श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा धार्मिक व आध्यात्मिक सोहळा १० मार्च २०२६ ते १६ मार्च २०२६ या कालावधीत भक्तिमय वातावरणात पार पडणार आहे.
या सोहळ्याचे कथा प्रवक्ते व भागवताचार्य ह.भ.प. श्री सिदाम महाराज काळे हे असून त्यांच्या ओजस्वी वाणीमधून श्रीमद्भागवत कथेचे निरूपण होणार आहे. त्यांच्या कीर्तनरूपी सेवेतून भाविकांना अध्यात्मिक ज्ञान व भक्तिरसाचा लाभ मिळणार आहे.
तसेच या कार्यक्रमात विविध नामवंत कलाकारांच्या संगीत भजन व संतवाणी सेवा आयोजित करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये श्री ऋषिकेशजी पाटील, श्री विष्णूबा सोळुंके, सौ. ज्योतीताई गोराणे धावेकर, प्रसिद्ध भजनसम्राट पंडित कल्याणजी गायकवाड व कौस्तुभ गायकवाड, प्रसिद्ध गीतकार भजनसम्राट ज्ञानेश्वर मेश्राम यांचा समावेश आहे.
याशिवाय अमृतपूर्व संतवाणी गायक पंडित रघुनाथजी खंडाळकर गुरुजी, शुभम खंडाळकर व सुरजन खंडाळकर (पुणे) हे देखील आपल्या संतवाणी व भजनाच्या माध्यमातून भाविकांना भक्तिरसाचा अनुभव देणार आहेत.
या सात दिवसीय सोहळ्यात दररोज भागवत कथा, हरिपाठ, कीर्तन, संगीत भजन व विविध धार्मिक कार्यक्रम होणार असून परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार आहे.
कार्यक्रमाची सांगता १६ मार्च २०२६ रोजी महाप्रसाद व धार्मिक विधींसह होणार आहे. या सोहळ्याचे आयोजन कुन्हाडे पाटील परिवार व आळंदी देवाची ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले असून सर्व भाविकांनी उपस्थित राहून पुण्यलाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.