logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

हे तर जनतेला लुटणारे सरकार फक्त एकदाच वाचा आणि मग ठरवा बरोबर कि चूक

दिनांक ६ नोव्हेंबर २०२५ रोजी नाडण ता. देवगड सिंधुदुर्ग ४१६८०५ येथील ग्रामपंचायत मध्ये महा विद्युत वितरण मंडळाच्या अधिकाऱ्यांबरोबर स्मार्ट एनर्जी मीटर संबंधात ग्राम सभा झाली , त्यातून निघालेले हे प्रश्न ........
१) स्मार्ट मीटर बदलण्याची सक्ती सरकार करते आहे का ?
२ ) एखाद्या ग्राहकाने पूर्वी जसा बाजारातून खरेदी केलेला मीटर बसविण्याची MSEB परवानगी देत होती तशी स्मार्ट मीटर बदलण्याची ग्राहकाला परवानगी आहे का ?
आणि सर्वात महत्वाचा .......
३) स्मार्ट मीटर reading बरोबर करते आहे किंवा नाही याची चाचणी घेण्याची यंत्रणा MSEB कडे आहे का ?
नसल्यास ती ग्राहकाला चाचणी देणे MSEB ला बंधन कारक आहे ., आणि ती चाचणी सुद्धा मीटरच्याच जाग्यावर ! .
४) लोकांना स्मार्ट मीटरचे अमिश दाखवून किंवा ग्राहकांच्या नकळत ज्यांची मीटर बदललेली आहेत त्यांची पूर्वीची चालू मीटर MSEB मंडळाने पुन्हा जोडून देणे.

MSEB महा विद्युत वितरण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिलेली उत्तरे

१) स्मार्ट मीटर बसवण्याची कोणतीही सक्त्ती सरकार करीत नाही ! .........to be noted

2) बाजारातून खरेदी करून स्मार्ट मीटर बसवण्याची परवानगी MSEB देत नाही .........to be noted

३) ग्राहकाला मीटर चाचणी करून देण्याची कुठलीही यंत्रणा MSEB कडे नाही . .........to be noted

४) ग्राहकांच्या नकळत ज्यांची मीटर बदललेली आहेत त्यांची पूर्वीची चालू मीटर MSEB मंडळाने पुन्हा जोडून द्यावीत याबद्दल कोणतेही उत्तर द्यावयास अधिकारी तयार नाहीत ., ग्रामसभेचातसा ठराव झाल्याचे पत्र आम्हास द्यावे लागेल .तर विचार करू

आता उत्तरांचा आपण परामर्श घेऊया
१) कोणतीही सक्त्ती नसतांना सुद्धा केवळ सरकारी ताकदीच्या जोरावर मीटर बदलली गेली
हि हुकूमशाही झाली ......

२) बाजारात खरेदी करून मीटर बसवायला MSEB परवानगी देत नाही याचाच अर्थ आम्ही देऊ तीच मीटर तुम्ही बदलायची आहेत कोणतीही चाचणी न देता
हि हुकूमशाही झाली ......

३) ग्राहकाला मीटर चाचणी करून देण्याची कुठलीही यंत्रणा MSEB कडे नाही कदाचित जास्त रिडींग घेईल अशी मीटर बसवणे सरकारला सहज शक्य आहे
हि हुकूमशाही च झाली ......

४) सक्त्ती नसतांना सुद्धा ग्राहकांच्या नकळत मीटर बदललेली पूर्वीची मीटर बसवून देणे याचा नकार देणे , नको ती कारणे सांगणे याचाच अर्थ
हि हुकूमशाही नाहीतर काय आहे .

सुज्ञास सांगणे आणखी न लगे !
........ क्षितिज बातम्या
नाडण , देवगड

127
9622 views

Comment