logo

१७ दिवसांनंतर रांजणगाव गणपतीत वीजपुरवठा सुरळीत — युवासेना जिल्हा प्रमुख बाप्पूसाहेब शिंदे व ग्रामपंचायत सदस्य अर्चनाताई शिंदे यांच्या प्रयत्नांना यश

रांजणगाव गणपती (प्रतिनिधी): वॉर्ड क्रमांक ६, माईंद नगर परिसरातील नागरिक गेल्या १७ दिवसांपासून वीजपुरवठा खंडित असल्यामुळे त्रस्त झाले होते. सलग तक्रारी असूनही संबंधित विभागाकडून तातडीने प्रतिसाद न मिळाल्याने रहिवाशांमध्ये संताप निर्माण झाला होता.

या समस्येची गंभीर दखल घेत युवासेना जिल्हा प्रमुख बाप्पूसाहेब शिंदे तसेच ग्रामपंचायत सदस्य अर्चनाताई बापूसाहेब शिंदे यांनी सातत्याने प्रयत्न केले. अखेर त्यांच्या पुढाकाराने महावितरण विभागाने तत्काळ दुरुस्तीचे काम पूर्ण करून वीजपुरवठा पुनर्संचयित केला.

स्थानिक नागरिकांनी या कार्याबद्दल शिंदे दाम्पत्यांचे मनःपूर्वक आभार मानले असून परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
रहिवाशांनी सांगितले की,

> “गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही अंधारात होतो. पण शिंदे दाम्पत्यांच्या प्रयत्नामुळे आज आमच्या घरात पुन्हा उजेड आला आहे.”



नागरिकांनी अशा जनसंपर्क व तत्पर सेवाभावाचे कौतुक केले असून, पुढेही गावातील विविध प्रश्न सोडवण्यासाठी स्थानिक नेतृत्वाकडून सकारात्मक पावले उचलली जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

7
1439 views