logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र मोहिमेला नंदुरबार जिल्ह्यात प्रारंभ : २२ जुलै ते २२ ऑगस्टदरम्यान विशेष शस्त्रक्रिया उपक्रम..


नंदुरबार /प्रतिनिधी:राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या निर्देशानुसार "मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र" ही विशेष मोहीम २२ जुलै ते २२ ऑगस्ट २०२५ या कालावधीत राबवण्यात येत आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विनय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार जिल्ह्यातही या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी सुरू झाली आहे.

सदर मोहिमेचा उद्देश राज्यातील ज्येष्ठ नागरिक व दृष्टी अडचणीत असलेल्या नागरिकांना मोफत व वेळीच उपचार उपलब्ध करून देणे हा आहे. यासाठी शासन, खाजगी, अशासकीय आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून एकूण *१ लाख मोतीबिंदू शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट* निश्चित करण्यात आले आहे.

*मोहिमेचे मुख्य वैशिष्ट्ये:*
⦁ *दृष्टीहीनतेपासून मुक्तता:* मोतीबिंदूमुळे निर्माण होणाऱ्या अंधत्वास प्रतिबंध.
⦁ *मोफत तपासणी व उपचार:* शासकीय व अशासकीय रुग्णालयांमार्फत मोफत शस्त्रक्रिया.
⦁ *समन्वयित सहभाग:* जिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रे, खाजगी हॉस्पिटल्स आणि स्वयंसेवी संस्था यांचा सक्रिय सहभाग.
⦁ *संपर्क व अहवाल:* प्रत्येक केंद्राकडून दररोज शस्त्रक्रिया संख्या अहवाल स्वरूपात वरिष्ठ कार्यालयास सादर करणे आवश्यक.

*जिल्ह्यातील तयारी:*
जिल्ह्यातील सर्व नेत्र तपासणी केंद्रांनी नागरिकांची नोंदणी व पूर्व तपासणी मोहीम सुरू केली असून, स्थानिक पातळीवर जनजागृतीसाठी बॅनर, पोस्टर, घोषणाबाजू, आशा कार्यकर्त्यांची मदत घेतली जात आहे.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विनय सोनवणे यांनी सांगितले की, “दृष्टी म्हणजे आयुष्याचे प्रकाशमान दालन आहे. मोतीबिंदू हा एका मर्यादेपलीकडे गेल्यावर कायमचा अंधत्व निर्माण करू शकतो. म्हणूनच वेळेत उपचार आवश्यक आहेत. ‘मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र’ मोहीम ही नागरिकांसाठी सुवर्णसंधी आहे.”

*नागरिकांसाठी आवाहन:*
जे नागरिक दृष्टी कमी होणे, धूसरपणा, रात्री कमी दिसणे अशा त्रासांनी पीडित आहेत, त्यांनी आपल्या जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा. त्यांचे मोफत तपासणी व आवश्यकतेनुसार शस्त्रक्रिया जिल्हा रुग्णालय किंवा निश्चित नेत्रतज्ञांमार्फत करण्यात येईल.

65
599 views

Comment