
वर्धा, शांतीनगर चौक मद्धे मदिरा प्रेमीची गर्दी.....
वर्धा :- शहरांलगतच्या शांतीनगत चौका त रोज रात्री मंदिराप्रेमीची मोठ्या प्रमाणात गर्दी असते.त्यांचे आपसातील वाद रस्त्यावर सुरु राहत असल्याने वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वर्धा ते पुलगाव हा मार्ग वाइफड रसूलाबाद येथून पुढे जातो, या मार्गावर लहान मोठी 12 ते 13 गावे येतात,त्या गावाचा संबंध वर्धा शहराशी आहे,येथील शेतकरी वर्ग आवश्यक खरेदीकरिता तसेच विध्यार्थी वर्ग शिक्षानाकरिता वर्धेत येतो,त्यामुळे या मार्गावर सतत वाहणांची गर्दी असते,सायंकाळी सहा वाजेपासून रात्री नऊ वाजेपर्यंत शांतीनगर चौका तुन जाणाऱ्या वाहणांची संख्या लक्षनीय आहे,याच वेळात शांतीनगर चौका त रोजचे कामकाज आटपून परत येणाऱ्या, ट्रक,टॅक्टर, टिप्पर या वाहना सह मजुरांची संख्या लक्षनीय असते,परत आलेली ही वाहने याच चौका त रस्त्याकडेला उभी केली जातात,येथेच वाहना तील मजूर उतरतात, त्यामुळे रात्री या चौका त गर्दी होते,त्यातच दिवसभराचे कबडकष्ट करून परत आलेले मजूर याच भागात मिळणाऱ्या गावठी दारुवर ताव मारल्यानंतर याच चौका तच भर रस्त्यावर वादविवाद करतांना आढळतात.वाइफड मांडवा मार्गावर जाणाऱ्या वाहन चालकांना येथून अत्यंत सावधपने वाहने पुढे काढावे लागतात,चुकून एखाद्या वाहणाला धक्का जरी लागला तर वादविवाद होऊन हाणामारी सारखे प्रकार घडतात,येथे घडलेल्या आजपर्यंच्या अनेक तक्रारी रामनगर व सावंगी पोलिसांकडे नोंदविण्यात आल्या आहे,तरीपण या चौका तील दारूचे अड्डे बंद झाले नाही,शांतीनगर चौका त रात्रीच्या सुमारास धुमाकूळ घालणाऱ्यांचा बंदोबस्त करावा,रस्त्याकडेला वाहने उभी करणाऱ्या वाहनचालकवर दांडात्मक कारवाही करण्यात यावी, या दृष्टीने समंधित प्रश्यासनाने तातडीने उपाय योजना करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.....