
प्रेस नोट
सिल्लोड ( प्रतिनिधी ) दि.15, तालुक्यातील सारोळा, पिंपळदरी, मोढा बुद्रुक येथे वीज पडून चार जणांचा त
प्रेस नोट
सिल्लोड ( प्रतिनिधी ) दि.15, तालुक्यातील सारोळा, पिंपळदरी, मोढा बुद्रुक येथे वीज पडून चार जणांचा तर आसडी येथे सर्पदंशाने एका महिलेचा मृत्यू झाला. आज आमदार अब्दुल सत्तार यांनी वरील गावांत जावून पीडित कुटूंबांची भेट घेवून घडलेल्या दुर्दैवी घटनेबद्दल शोक व्यक्त केला. नैसर्गिक आपत्तीतील संकटात राज्यशासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगत आमदार अब्दुल सत्तार यांनी पीडित कुटुंबांना धीर दिला.
सोमवार ( दि.14 ) रोजी दुपारी वादळी वाऱ्यामध्ये विज पडून सिल्लोड तालुक्यातील सारोळा येथे रोहित व यश राजू काकडे या दोन भावांचा तर पिंपळदरी येथे शिवाजी सतीश गव्हाणे तसेच मोढा बुद्रुक येथे रंजना बापूराव शिंदे या चार जणांचा मृत्यू झाला. त्यासोबतच आसडी येथे सुमित्रा चंदू सोनवणे या महिलेचा सर्पदंशाने मृत्यू झाला. पीडित कुटुंबांची आमदार अब्दुल सत्तार यांनी भेट घेतली.
-------
वादळी वारा व वीज पडून झालेल्या जीवितहानी व इतर नुकसानीचे पंचनामा करून त्वरित शासनास अहवाल सादर करण्याचे निर्देश आमदार अब्दुल सत्तार यांनी उपस्थित शासकीय अधिकाऱ्यांना दिले. पंचनामा करीत असताना एकही नुकसानग्रस्त पंचनामा पासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी असे देखील त्यांनी निर्देशित केले.
--------------
यावेळी आमदार अब्दुल सत्तार यांच्यासमोर पीडित कुटुंबांनी टाहो फोडला, आक्रोश केला. यावेळी उपस्थित सर्वांनाच अश्रू अनावर झाले. घडलेल्या घटनेचा पंचनामा करून अहवाल सादर करण्याच्या सूचना प्रशासनास देण्यात आल्या आहेत. यासोबतच आपण देखील मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री यांच्याकडे पीडितांना शासनाच्या वतीने जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगत आमदार अब्दुल सत्तार यांनी पीडितांना वैयक्तिक मदतीची ग्वाही दिली.
-------
शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी
हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पुढील काही दिवस मेघ गर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असल्याने शेतकरी बांधवांनी आपली व आपल्या जनावरांची काळजी घ्यावी असे आवाहन आमदार अब्दुल सत्तार यांनी केले. जेव्हा आकाशात विजा चमकत असतील आणि ढगांचा गडगडाट होत असेल, तेव्हा शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. शक्य असल्यास, शेतात काम करणे टाळा, उंच झाडा खाली उभे राहू नका आणि सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्या, जनावरांची काळजी घ्या असे आवाहन आमदार अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांना केले.
-------
यावेळी जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पा. गाढे, तहसीलदार सतीश सोनी, नायब तहसिलदार शेख हरून, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष केशवराव पा. तायडे ,शिवसेना उपजिल्हाप्रमुख देविदास पा. लोखंडे, तालुकाप्रमुख मारोती वराडे, कृउबा समितीचे संचालक भावराव पा. लोखंडे, मंडळ अधिकारी काशिनाथ ताठे, राजेंद्र ठोंबरे, संजय डमाळे, माजी पं. स.सदस्य विक्रात दौड, विशाल जाधव, आशिष कटारिया यांच्यासह पिंपळदरी सरपंच सुनील माहोर, सारोळा सरपंच मोहन गायकवाड, नारायण वराडे, आसडी चे माजी सरपंच फकीरराव सुरडकर, मोढा बु चे माजी सरपंच दिपक हावळे, संभाजी हावळे, गणेश ढोरमारे आदिंसह वरील गावातील तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक व गावकऱ्यांची उपस्थिती होती.