logo

प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतून देशभरात १ कोटी कुटुंबांना ३०० युनिट मोफत वीज – आमदार बबनराव लोणीकर परतूर प्रतिनिधी :- भाऊसाहेब पाटील मुके

परतूर तालुक्यातील आष्टी गावात १,३५७ लाभार्थ्यांना PMAY-G अंतर्गत आमदार बबनराव लोणीकर यांच्या शुभ हस्ते मंजुरीआदेश वाटप

प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतून देशभरात १ कोटी कुटुंबांना ३०० युनिट मोफत वीज – आमदार बबनराव लोणीकर

आयुष्मान भारत योजने अंतर्गत ५५ कोटी नागरिकांना दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचार — आमदार लोणीकर

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजने द्वारे ८१ कोटी नागरिकांना मोफत अन्नधान्य पुरवठा — आमदार बबनराव लोणीकर

देशभरात मोदीजींच्या संकल्पनेतून प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत ४ कोटींहून अधिक कुटुंबांना पक्की घरे मिळाली — आमदार लोणीकर

अकरा वर्षाच्या कार्यकाळात केंद्र सरकारने राबविलेल्या विविध योजने मूळे देशभरातील 25 कोटी नागरिकांनी दारिद्ररेषा ओलांडली — आमदार लोणीकर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृ सरकारने २०१४ ते २०२५ या कालावधीत गरीब कल्याणासाठी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत ४ कोटींहून अधिक कुटुंबांना पक्की घरे मिळाली, ज्यामुळे त्यांचे राहणीमान सुधारले. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजने द्वारे ८१ कोटी नागरिकांना मोफत अन्नधान्य पुरवठा करून अन्नसुरक्षा सुनिश्चित केली गेली. आयुष्मान भारत योजने अंतर्गत ५५ कोटी नागरिकांना दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचार मिळाले, ज्यामुळे गरीबांना मोठ्या आजारांवर उपचाराची सुविधा उपलब्ध झाली. यामुळे २५ कोटींहून अधिक नागरिकांनी दारिद्र्यरेषा ओलांडली. या कल्याणकारी योजना, कौशल्य विकास, आणि आर्थिक समावेशनामुळे लाखो लोकांचे जीवनमान उंचावले आणि सामाजिक-आर्थिक विकासाला चालना मिळाली, असे माजी मंत्री आणि परतुरचे आमदार बबनराव लोणीकर यांनी नमूद केले.

ऊर्जा विभाग आणि महावितरण यांच्या संयुक्त विद्यमाने प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना अंतर्गत "हर घर सोलार" योजनेचा शुभारंभ आणि प्रधानमंत्री आवास योजना - ग्रामीण (PMAY-G) अंतर्गत १,३५७ लाभार्थ्यांना मंजुरी आदेशांचे वाटप सोहळा १२ जून २०२५ रोजी खंडेश्वर मंदिर, आष्टी येथे अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन आणि मंजुरी आदेशांचे वाटप मा. श्री. बबनराव लोणीकर माजी मंत्री आणि आमदार, महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते पार पडले. या प्रसंगी उपस्थित आष्टी व आष्टी सर्कल मधील हजारो लाभार्थी महिला पुरुषांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
या प्रसंगी व्यास पिठावर भाजपा परतूर तालुका अध्यक्ष शत्रूघण कणसे, रमेश भापकर, तुकाराम सोळंके, गजानन लोणीकर, रवी सोळंके,सिद्धू केकाण, बाळासाहेब लहाने, रंगनाथ येवले, बाबाराव थोरात, सुदाम प्रधान, कृष्णा टेकाळे, रामदास काका सोळंके, मोहम्मद जमीनदार, राजेंद्र बाहेती, प्रदीप ढवळे, विष्णूपंत शहाणे, अमोल जोशी, भगवान कांबळे, संजय सदग अधीक्षक अभियंता महावितरण, पद्माकर गायकवाड उपविभागीय अधिकारी परतूर, श्रीमती प्रतिभा गोरे तहसीलदार परतूर, उदयसिंग राजपूत उप मुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत जि.प. जालना, एस.बी. मठपती कार्यकारी अभियंता महावितरण, राजेश तांगडे गटविकास अधिकारी परतूर, राधेश्याम कुमावत सहायक अभियंता महावितरण यांची उपस्थिती होती.

केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांबद्दल सविस्तर माहिती दिली. त्यांनी सौरऊर्जेच्या महत्त्वावर प्रकाश टाकत, या योजनेद्वारे वीज बिल कमी करणे, पर्यावरण संरक्षण, आणि स्थानिक स्तरावर रोजगार निर्मितीला चालना मिळेल, असे प्रतिपादन केले. तसेच, PMAY-G योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील गरजूंना पक्की घरे मिळणे हे सामाजिक समतेच्या दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे त्यांनी नमूद केले.

हा कार्यक्रम जालना जिल्ह्यात नवीकरणीय ऊर्जा आणि ग्रामीण गृहनिर्माणाला प्रोत्साहन देण्याच्या केंद्र आणि राज्य सरकारच्या वचनबद्धतेचे प्रतीक ठरला. महावितरण आणि स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत आहे. माजी मंत्री, आमदार बबनराव लोणीकर यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे लाभार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

या वेळी पुढे बोलतांना आमदार बबनराव लोणीकर यांनी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना पक्की घरे बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य प्रदान करते. जालना जिल्ह्यात परतूर तालुक्यातील आष्टी या गावात १,३५७ लाभार्थ्यांना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या शुभहस्ते मंजुरी आदेशांचे वाटप करण्यात आले, जे ग्रामीण गृहनिर्माणाच्या प्रगतीचे द्योतक आहे. या योजने अंतर्गत घरांचा किमान आकार २५ चौरस मीटर असून, स्वच्छ अन्न शिजवण्यासाठी समर्पित क्षेत्राचा समावेश असल्याचे नमूद केले.

पुढे बोलतांना आमदार बबनराव लोणीकर म्हणाले कीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १३ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना चालू केली. या योजने अंतर्गत १ कोटी कुटुंबांना दरमहा ३०० युनिट मोफत वीज पुरवण्यासाठी रूफटॉप सोलर पॅनेल बसवण्याचे उद्दिष्ट आहे. योजनेचा उद्देश सौरऊर्जेचा वापर वाढवणे, वीज बिल कमी करणे, आणि पर्यावरण संरक्षणाला चालना देणे आहे. लाभार्थ्यांना थेट बँक खात्यात अनुदान आणि सोलर पॅनेल बसवण्यासाठी स्वस्त बँक कर्ज उपलब्ध आहे.

या कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता आष्टी चे सरपंच मधुकर मोरे उपसरपंच नसरूल्हा काकड, बबलू सातपुते, अमोल मोरे, अनंता आगलावे, सईद शेख, रफिक राज, असेफ कच्छी, आफताब कुरेशी सर्व ग्रामपंचायत सदस्य आणी ग्रामविकास अधिकारी डी बी काळे यांनी प्रयत्न केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गांजाळे यांनी केले.

2
124 views