logo

गडचिरोलीत हत्ती, तर तिकडे देसाईगंजमध्ये अस्वलाचा संचार. वन्यप्रान्यांची शहराकडे धाव.

गडचिरोलीत हत्ती, तर तिकडे देसाईगंजमध्ये अस्वलाचा संचार


शनिवारच्या मध्यरात्री गडचिरोली शहरात दाखल झालेल्या दोन हत्तींनी गडचिरोलीकरांचा थरकाप उडविला असताना रविवारच्या रात्री देसाईगंजमध्ये अस्वल शिरल्याचे निदर्शनास आले. सोमवारी सकाळी ही खबर शहरभर पसरल्याने नागरिक दहशतीत आले. दरम्यान हा प्रकार वडसा वनविभाग किंवा वनपरिक्षेत्र कार्यालयाने गांभिर्याने घेऊन नागरिकांना कोणतीही सूचना केली नाही. दुसरीकडे वन्यप्राणी जंगल सोडून शहराकडे धाव घेण्यामागे नेमके कोणते कारण आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

प्राप्त माहितीनुसार, हे अस्वल ब्रम्हपुरी मार्गावरील बालाजी चेंबर परिसरात एक रानटी अस्वल मुक्तपणे फिरताना नजरेस पडले. कोणीतरी त्या अस्वलाला मोबाईलच्या कॅमेऱ्यात टिपले. त्यानंतर काही वेळात ते अस्वल अंधारात कुठेतरी निघून गेले. हे अस्वल पुन्हा कधीही शहरात शिरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

अस्वलासारखा हिंस्र प्राणी शहरात शिरल्यानंतर वनविभागाने तातडीने हालचाली करत त्या अस्वलाला सुरक्षितपणे नागरी वसाहतीपासून दूर नेणे आणि नागरिकांसाठी भयमुक्त वातावरण निर्माण करणे ही वनविभागाची जबाबदारी असताना वनविभागाने हा प्रकार गांभिर्याने घेतला नाही. त्यामुळे वडसा वनविभाग एखाद्या अपघाताची वाट पाहात आहे का? असा संतप्त सवाल काँग्रेसचे पिंकू बावणे यांनी उपस्थित केला आहे.

अशी बाळगा सावधगिरी

नागरिकांनी अशा प्रसंगी सावध आणि सुरक्षित राहावे. रात्री अनावश्यक घराबाहेर पडू नये, लहान मुले, वृद्ध, महिलांनी विशेष काळजी घ्यावी. बाहेर जायचेच असेल तर गटाने फिरा; टॉर्च, शिट्टी, आवाज करणारी साधने जवळ ठेवा. अस्वल दिसल्यास त्याच्या जवळ जाऊ नका, त्याला हाकलण्याचा प्रयत्न तर अजिबात करू नका आणि वनविभाग किंवा पोलिसांना त्वरित माहिती

19
1457 views