logo

*बिगर मोसमी पावसामुळे श्रीपूर मध्ये भाज्यांचे दर दुप्पट झाले*


*श्रीपूर*

गेल्या आठवड्यापासून सर्वत्र बिगर मोसमी पाऊस धुवांधार कोसळत असल्याने गेल्या आठवड्यात असलेल्या भाजी पाल्यांचे दर जवळपास दुप्पटीने वाढले आहेत त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागला आहे दर रविवारी श्रीपूर मध्ये भाजी मंडई मोठी भरते या परिसरातील सर्व शेतकरी आपल्या शेतातील सर्व प्रकारच्या भाज्या फळे विक्री साठी घेऊन येतात आज मंडईमध्ये केशर हापूस आंबा फक्त स्वस्त होता शंभर रुपयाला दोन किलो आंबे असा दर होता गेल्या आठवड्यात कोथिंबीर एक जुडी पंधरा रुपये टोमॅटो वीस रुपये किलो वांगी तीस रुपये किलो हिरवी मिरची पन्नास रुपये किलो होती ती आज टोमॅटो ऐंशी रुपये वांगी साठ रुपये मिरची ऐंशी रुपये कोथिंबीर जुडी चाळीस रुपये अशा चढ्या दराने विक्री झाली श्रीपूर मध्ये भाजी मंडई आवारात दरवर्षी प्रमाणे सर्वत्र चिखल दलदल झाली आहे त्यामुळे विक्रेते मंडई सोडून अन्यत्र रस्त्यावर बसल्याचे पहायला मिळाले नगरपंचायत कडे विक्रेत्यांनी नागरिकांनी अनेकदा मंडई आवारात काँक्रिट रस्ते करा म्हणून निवेदन दिले व्हाट्सअप वर मेसेज पाठवले पण कसलाही प्रतिसाद दिला नाही दखल घेतली जात नाही मंडईत भाजी विक्रेते यांच्याकडून दर आठवड्याला पावती फाडली जाते एकंदरीत कसलीही शिस्त नाही नियोजन नाही

23
1117 views