
ऑपरेशन सिंदूर संपलेले नसून, पाकिस्तानने कुरापती सुरूच ठेवल्या तर जगाच्या नकाशावरून पाकिस्तानला नष्ट केल्याशिवाय भारतीय सैनिक राहणार नाहीत. - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन.
*परतूर शहरात, भारतीय सैन्य दलाच्या सन्मानात भव्य तिरंगा रॅली संपन्न.
पाकिस्तानने निरपराध भारतीयांची हत्या करण्याची पातक केल्यास त्याला पाकिस्तानात घुसून सडेतोड उत्तर देण्याची ताकद भारतीय सैन्य दलामध्ये - आमदार बबनराव लोणीकर
पाकिस्तानची मस्ती जिरवण्याची ताकद भारत देशामध्येच. - आमदार लोणीकर
आंतरराष्ट्रीय सीमेपासून १०० किलोमीटर अंतरावर असणाऱ्या बहावलपूर या अड्ड्याला उद्ध्वस्त केल्यानंतर पाकिस्तानसह जगाने भारताचे ताकद ओळखली - आमदार लोणीकर.
भारतीय सैन्य दलाला सेवा दिलेल्या माजी सैनिकांचा माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केला सत्कार.
परतूर (प्रतिनिधी) :-
भाऊसाहेब पाटील मुके -
पाकिस्तानी अतिरेक्यांनी पहलगाम हल्ल्यात २६ पर्यटकांचा गोळ्या झाडून जीव घेतला
. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आक्रमक होत भारतीय सैन्य दलाल उत्तर देण्याची मुभा देऊन या हल्ल्याला चोख उत्तर दिले जाईल असे इशारा पाकिस्तानला दिला होता. भारताने अखेर पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला आहे. पाकिस्तानातील ९ दहशतवादी तळ उद्धवस्त केले. थेट एअर स्ट्राइकच्या माध्यमातून पाकिस्तानवर हल्ला चढवण्यात आला याला ऑपरेशन सिंदूर असे नाव देण्यात आले. हे तिन्ही सैन्य दलांच जॉइंट ऑपरेशन होतं. भारताच्या पराक्रमी सैन्याने पाकिस्तानातील ४ आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ५ तळांना टार्गेट केलं. भारताची गुप्तचर यंत्रणा रॉ ने सर्व टार्गेटस निवडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.यापुढे देखील पाकिस्तानने निरपराध भारतीयांची हत्या करण्याची पातक केल्यास त्याला पाकिस्तानात घुसून सडेतोड उत्तर देण्याची ताकद भारतीय सैन्य दलामध्ये आहे असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार श्री बबनराव लोणीकर यांनी आज केले.
भारतीय सैन्याचे मनोबल वाढावे यासाठी देशभरात देशभक्त नागरिकांच्या वतीने सैन्याच्या समर्थनार्थ तिरंगा यात्रा काढण्यात येत आहेत त्याचाच भाग म्हणून परतूर शहरांमध्ये आज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज रेल्वे उड्डाणपूल ते श्री विठ्ठल मंदिर पर्यंत तिरंगा यात्रा काढण्यात आली. या तिरंगा यात्रेमध्ये राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह अनेक देशभक्त नागरिक सहभागी झाले होते. यावेळी देशासाठी सैन्य दलात काम करणाऱ्या आजी-माजी सैनिकांचा सत्कार देखील करण्यात आला. वंदे मातरम भारत माता की जय अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. यावेळी परतूर शहरातील वातावरण देशभक्तीमय झाले होते.
भारताने पहलगामचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानच्या ९ दहशतवादी तळांवर वायुसेने द्वारे हल्ला करून सडेतोड उत्तर देत जोरदार हल्ला चढवून प्रत्युत्तर दिले आहे यामध्ये १०० पेक्षा अधिक दहशतवाद्यांचा खात्मा देखील झाला आहे. यामध्ये बहावलपूर, मुरिदके, गुलपूर, लष्कर कॅम्प सवाई, बिलाल कॅम्प, कोटली, बरणाला, सरजाल कॅम्प, सियालकोट जवळ मेहमुना कॅम्प या दहशतवादी तळांचा समावेश होता. भारतीय सेनेच्या वतीने उद्ध्वस्त करण्यात आलेल्या ठिकाणांमध्ये जैश ए मोहम्मद या अतिरेकी संघटनेचे मुख्यालय, लष्कर ए तोयबा दहशतवादी संघटनेचा अड्डा, यासह हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेच्या प्रशिक्षण स्थळाचा समावेश होता. तर बहावलपुर हे आंतरराष्ट्रीय सीमेपासून जवळपास १०० किलोमीटर अंतरावर आहे आणि हे सर्व दहशतवादी अड्डे भारतीय सैन्य दलाच्या कारवाईत उद्धवस्त झाले आहेत ही भारताची खरी ताकद आहे ही बाब संपूर्ण जगाच्या लक्षात आली आहे. असेही आमदार बबनराव लोणीकर यावेळी म्हणाले.
भारतीय सैन्य जगभरातील प्रगत राष्ट्रांच्या सैन्याच्या बरोबरीचे व शस्त्रास्त्रदृष्ट्या प्रचंड ताकतीचे आहे. तत्कालीन पंतप्रधान श्री अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात शास्त्रज्ञ असणारे भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या मार्गदर्शनाखाली भारत संरक्षण क्षेत्रात प्रगत झाला असून भारताकडे अत्याधुनिक स्वरूपाचा प्रचंड मोठा शस्त्रसाठा आज उपलब्ध आहे अशा परिस्थितीत पाकिस्तानने कुठल्याही परिस्थितीत भारताला आणखी त्रास देण्याचा किंवा कुठलाही भ्याड हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यास भारत सडेतोड उत्तर देण्यास तयार असल्याचे यावेळी बोलताना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी सांगितले
. यापुढे पाकिस्तानने कुठलाही आगाऊपणा केल्यास भारत पाकिस्तानला पूर्णपणे नेस्तनाबूत करण्याची ताकद ठेवतो हे बाब आंतरराष्ट्रीय स्तरावर निदर्शनास आली आहे. असेही आमदार बबनराव लोणीकर म्हणाले.
==================
यावेळी सैन्य दलात सेवा देऊन निवृत्त झालेल्या सैनिक तुकाराम उबाळे प्रशांत पुरी राजेंद्र सोनटक्के प्रकाश हिवाळे रामचंद्र धुमाळ सुभेदार नामदेव काकडे डी के कळकुंबे विजय सोनटक्के यांचा आदरपूर्वक सन्मान महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री कर्तव्यदक्ष आमदार बबनराव लोणीकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
यावेळी भाजपा प्रदेश सचिव राहुल लोणीकर, शत्रुघ्न कणसे, रमेश भापकर, अशोकराव बरकुले भगवानराव मोरे, दया काटे शहराध्यक्ष प्रवीण सातोनकर, संदीप बाहेकर, कृष्णा आरगडे, संभाजी वारे रवींद्र सोळंके प्रकाश दीक्षित सिताराम राठोड सावता काळे गजानन लोणीकर, ओम प्रकाश मोरे दिलीप होलानी अर्जुन राठोड दिगंबर मुजमुले शिवाजी पाईकराव राजू मस्के अर्जुन जगताप सुरज घनवट पृथ्वीराज अंभोरे दादाभाऊ तो र , भगवान आरडे अमोल शहाणे विठ्ठल बिडवे, अजय चव्हाण निर्दास राठोड कैलास चव्हाण विजय यादव विष्णू काळे आनंद कोटेच्या बालाजी सांगोळे सचिन काटे विकास बोडके दीपक कुऱ्हे कुणाल बनसिले नरेश कांबळे मधुकर मोरे, अनंता आगलावे, श्री गांजाळे, अशोक शेळके, वसंत राजबिंडे विश्वंभर शेळके अशोक दांगट ओम साठे नदीम शेख युसूफ भाई बाजीराव कासारे रामप्रसाद गिरी कृष्णा मोठे वसंत भापकर निवृत्ती गोरे केशव ढवळे राजू ढवळे सुंदर मुळे यांच्यासह शेकडो देशभक्त नागरिकांची उपस्थिती होती