
ऑल इंडिया मीडिया असोसिएशन न्यूज | प्रतिनिधी – अब्दुल फारूक
सिद्धेश्वर, ता. औंढा नागनाथ, जि. हिंगोली
तीन दिवसांपासून वीज व पाणीपुरवठा बंद – संतप्त ग्रामस्थांचा 33 केव्ही उपकेंद्रावर तीव्र आंदोलन, साप चावल्याची घटना घडल्याने खळबळ
सिद्धेश्वर गावात गेले तीन दिवस वीज आणि पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित असल्यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या समस्येने त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी बुधवारी सकाळपासून 33 केव्ही वीज उपकेंद्रावर जोरदार आंदोलन छेडले. वीज वितरण विभागाच्या निष्क्रियतेविरोधात संतप्त महिलांनी आणि पुरुषांनी घोषणाबाजी केली.
प्रभावित परिस्थिती –
महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी दूरवर जावे लागत होते.
शेतातील पिके सुकण्याच्या मार्गावर आहेत.
विद्यार्थी व अभ्यासावर परिणाम झाला असून घरगुती व्यवहार ठप्प झाले आहेत.
या काळात गावातील एका तरुणाला साप चावल्याची घटना घडली. वीज नसल्यामुळे वेळेवर उपचारासाठी अडथळे निर्माण झाले. ग्रामस्थांनी सांगितले की, वेळेवर उपचार मिळाले नसते, तर जीवितहानी झाली असती.
प्रचंड संतापाच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थ उपकेंद्रावरच तळ ठोकून बसले. रात्री १० ते ११ वाजेपर्यंत महिलांसह ग्रामस्थ तिथे उपस्थित राहिले. अखेर तांत्रिक टीमने लाईन दुरुस्त करून वीजपुरवठा सुरू केला.
या आंदोलनात पुढील महिलांचा सहभाग उल्लेखनीय होता –
1. शांताबाई सुनील चव्हाण
2. लताबाई राठोड
3. कावेरीबाई चौधरी
4. शेषकला चव्हाण
5. अरुणा हांडगे
6. अनिता राठोड
7. कविता राठोड
8. गंगूबाई जाधव
9. सविता राठोड
10. कमलाबाई पुंडगे
11. माया पवार
12. कौशल्या शिंदे
13. सविता मुकाडे
14. सावित्रीबाई चव्हाण
तसेच इतर ग्रामस्थही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
ग्रामस्थांचा इशारा –
"पुन्हा अशीच समस्या उद्भवली, तर यापेक्षाही मोठे आंदोलन करण्यात येईल."
ऑल इंडिया मीडिया असोसिएशन न्यूज – अब्दुल फारूक, सिद्धेश्वर