logo

सामाजिक न्याय, आदिवासी विकास खात्याचा वळवलेला निधी परत करावा.. जिल्हा अध्यक्ष सोपान सोळंके

संग्रामपूर: सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास खात्याचा वळवलेला निधी परत करावा
यांच्यासाठी दि. १३/५/२०२५ माहीम राज्यपाल यांना
तहसिलदार साहेब संग्रामपूर यांच्या वतीने निवेदन सादर केले.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी वित्त विभागाने सामाजिक न्याय व आदिवासी विकास विभागाचे ७४६ कोटी रुपये महीला विकास विभागाकडे वळवल्याने
अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या कार्यकर्त्यामध्ये महाराष्ट्रात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
आदिवासी समाज हा हजारो वर्षा पासून दारिद्र्यात खितपत पडलेला समाज आहे. आदिवासींना दिला जाणारा निधी कमी पडतो त्यात सरकारने त्यांचा निधी लाडकि बहिन योजनेसाठी वळवला हा आदिवासी समाजावर अन्याय आहे असे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद अध्यक्ष सोपान सोळंके म्हणाले
आदिवासींना उपासी ठेऊन सरकार आपल्या फायद्यासाठी आदिवासींचा निधी दुसऱ्या योजने साठी वापरत आहे.
सरकारला आदिवासींचे दारिद्रय, बेकारी, उपासमार दिसत नाही काय असा सवाल जिल्हा अध्यक्ष सोपान सोळंके यांनी केला.
हुसेन काका पालकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच
मंगलसिंग माणिकराव पवार, देविदास डावर, राधेश्याम खरात
रवि सोळंके यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
निवेदन देते वेळी
आकाश पवार, किसन डाबेराव, मधुकर बातकर ,हरीश फकिरा केदार, कैलास सोळंके ,जाबिर मोरे साकीर केदार जानकीराम डाबेराव ,भायलाल जांभळे ,दत्ता बाबले, गजानन डाबेराव इत्यादी आदिवासी पदाधिकारी उपस्थित होते.

86
18602 views