logo

अखंडीत वीज सेवेसाठी संपुर्ण कार्यक्षमतेने काम करा : सहव्यवस्थापकीय संचालक धनंजय औंढेकर यांचे निर्देश

जनमित्र, अधिकारी कर्मचाऱ्यांचा सुसंवाद मेळावा उत्सहात संपन्न..


हिंगोली, दि. 12 मे : विजेसारख्या सेवा क्षेत्राात आपण कार्यरत असून, वीजग्राहकांना अखंडीत वीजसेवा देणे ही आपली महत्वपुर्ण जबाबदारी आहे. त्याद्ष्टीने नियोजन करून संपूर्ण कार्यक्षमतेने अखंडीत वीजसेवेसाठी प्रयत्नरत रहावे असे निर्देश महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक तथा कार्यकारी संचालक (पायाभूत आराखडा) धनंजय औंढेकर यांनी दिले.

हिंगोली येथील शिवाजीराव देशमुख सभागृह, रामलीला मैदान येथे सोमवारी (दि.१२ मे) अधीक्षक अभियंता राजेसिंग चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या सुसंवाद मेळाव्यात हिंगोली मंडळातील सर्व जनमित्र, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना श्री औंढेकर म्हणाले की, वीज ग्राहकांना अखंडीत वीजसेवा दिली तर वीजग्राहक आपल्यापासून दुर जात नाही परिणामी आपण विकलेल्या विजेच्या प्रत्येक युनीटची वसुली करणे सोपे जाते. सेवेप्रति निष्ठावान असलेल्या काही लाईनमनची उदाहरणे देत लाईनमन कसा असावा व कसा असू नये याविषयी मार्गदर्शन केले. मार्च महिन्यात केलेल्या वीजबील वसुलीचे कौतूक करत, केवळ एका महिण्याच्या कामगिरीवर समाधान मानून चालणार नाही, प्रत्यक महिना हा मार्च समजूनच प्रत्येकाने कार्यरत रहायला हवे अशाही सुचना केल्या. त्याचबरोबर मे पर्यंत ३३ केव्ही ११ केव्ही वीजवाहिनीला अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांदयांची रितसर परवानगी घेवून छाटनी करून घ्‍यावी. आपली वीजवाहिनी ट्रीप होते की नाही याची संबधीतांनी काळजी घ्यायला हवी. ट्रीपींग न झाल्यास वीजतारा तुटन्‍यांचे प्रकार घडतात, प्रसंगी दुर्घटनाही घडू शकते. त्याचबरोबर झाडांच्या फांद्या वीजतारेला लागुन वीजपुरवठा खंडीत तर होतोच सोबतच तब्बल ३० ते ४० हजार युनीटचे नुकसान होते. तसेच ३३/११ केव्ही उपकेद्रातील पॉवर ट्रान्सफॉर्मरला प्रोटेक्शन दिल्याची खात्री करावी असेही निर्देश दिले. लाईनमनच्या सुरक्षेला प्राधान्य देत सर्व कर्मचाऱ्यांना टीएनपी, रेनकोट, गमबुट, रबरी हातमोजे व पोर्टेबल शिडी देण्याचे आश्वासन श्री औंढेकर यांनी याप्रसंगी दिले. त्याचबरोबर हिंगोली जिल्हयातील वीजगळतीचे प्रमाण पाहता सातत्याने वीजचोरी विरोधात मोहीम राबवावी. कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडीत झालेल्या वीज ग्राहकांकडील शेकडो कोटींची थकबाकी बाबत चिंता व्यक्त करत पीडी केलेल्या वीज ग्राहकांचे दुसरे कनेक्शन शोधून थकबाकीचा बोजा चालू असलेल्या कनेक्शन टाकून बील न भरल्यास दुसरे कनेक्शनही कट करण्‍याचे निर्देश दिले. त्याचबरोबर प्रधानमंत्री सुर्यघर योजना व सौर कृषी पंपाच्या योजनेचा लाभ देण्यासाठी निहीत वेळेत अर्ज मंजूर करून जास्तीत जास्त ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा यासाठी प्रयत्न करण्याचेही निर्देश सहव्यवस्थापकीय संचालक धनंजय औंढेकर यांनी दिले. वीज ग्राहकांच्या घरात वीज पोहचवण्यासाठी जवळपास साडेआठ रूपये खर्च येतो तो वसूल करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत असे सांगत मार्च महिन्यात थकबाकी शुन्य केलेल्या गावांचे लाईनमन यांचे कौतूक करत सत्कार केला.
सुसंवाद मेळाव्याचे प्रास्ताविक अधीक्षक अभियंता राजेसिंग चव्हाण यांनी केले. सदरील सुसंवाद मेळाव्यास हिंगोली मंडळातील सर्व कार्यकारी अभियंते, उपविभागीय अभियंते, शाखा अभियंते तसेच मानव संसाधन व लेखा विभागाचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

0
0 views