logo

सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू . . . .

ठाणे / शहापूर .
दि. ७/३/२०२५ रोजी दुपारी १५ : ३० वाजता कै.सौ. सुजाता शिवाजी देसले (वय वर्षे ४५) आपल्या पतीसोबत घराजवळील शेतात भेंडी तोडणीचे काम करत होत्या. शेताच्या बांधा जवळ दबा धरून बसलेल्या " सरीसृप " वर्गातील विषारी प्रजातीच्या (नाजा नाजा) भारतीय नागाने त्यांच्या उजव्या पायाला चार वेळा दंश केला. ही घटना शहापूर तालुक्यातील मोहीपाडा चिखलगावात घडल्यामुळे त्यांना किन्हवली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्यांची प्रकृती जास्त गंभीर झाल्याने दुपारी १५ : ४० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली . या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली.

‌जागतिक आरोग्य संघटना (WHO) ने सर्पदंशाच्या विषयावर अनेक अहवाल प्रकाशित केले आहेत. त्यानुसार, सर्पदंशामुळे होणाऱ्या मृत्यू आणि अपंगत्वाची संख्या खूप आहे . सर्पदंशाच्या अहवालातली माहितीनुसार जगभरात दरवर्षी १.२ दशलक्ष ते ५.५ दशलक्ष सर्पदंशाच्या घटना घडतात . भारतात दरवर्षी दहा लाख जनतेला सर्पदंश होतात . तर जवळपास ८१,००० ते १३८ , ००० जनता सर्पदंशाने मृत्यूमुखी पावते. तसेच सर्पदंशामुळे ४ , ०० , ००० लोकांना कायमचे अपंगत्व येते . उपचार पद्धती मिळाल्यास सर्पदंशामुळे होणाऱ्या मृत्यू आणि अपंगत्वाची संख्या ५०% ने कमी करणे शक्य आहे . सर्पदंशामुळे होणाऱ्या मृत्यू आणि अपंगत्वाची संख्या कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यात येऊ शकतात .

आमच्या माहिती प्रमाणे बाजूच्या राज्यामध्ये (उदा ० कर्नाटक , ओरिसा , पंजाब , बंगाल , राजस्थान , केरळ , मध्य प्रदेश इत्यादी) राज्यात सर्प - विंचू दंशाने व्यक्ती बाधित / मृत झाल्यास किंवा कायमचे अपंगत्व आल्यास घरातील कर्त्या व्यक्तीस झालेल्या अपघातामुळे कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणीची परिस्थिती निमार्ण होऊन अशा बाधित कुंटूबीयांवर उपासमारीची वेळ येते . अशा अपघात ग्रस्त कुंटूबीयांना सहाय्यतेसाठी आर्थिक मदतीचा हात मिळतो मग ह्या राज्यात का नाही ?

सदर एखाद्या व्यक्तीने सापाला ठार केले तर त्या सापाला वन्यजीव ग्राह्या धरुन वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ नुसार त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल होतो . पण एखाद्या व्यक्तीचा सर्प - विंचू दंशाने बाधीत झालेल्या व्यक्तीला मदतीचा हात मिळत नाही . त्यामुळे मदतीस अपात्र ठरतो. हा दुजाभाव का ?

सदर वरील विषयावर निसर्ग विज्ञान संस्थेने सर्प - विंचू दशांने दगावलेल्यांच्या कुटुंबाच्या सहाय्यतेसाठी आर्थिक मदतीचा हात मिळणे बाबत दि . १३ स्पटेंबर २०१० रोजीच्या पत्रांन्वये आम्ही वरील विषयाचे अनुषंगाने इतर सर्व घटनांवर सर्वकष उहापोह करुन सविस्तर अहवाल आम्ही भारत सरकारचे प्रमुख या नात्याने मा . केंद्रीय पर्यावरण मंत्रालय भारत सरकार आणि महाराष्ट्र राज्यचे प्रमुख या नात्याने मा . राज्यपाल महाराष्ट्र राज्य , मा . मुख्यमंत्री, मा . वनमंत्री , मा . आदिवासी विकास मंत्री , मा. आरोग्य मंत्री, मा . कृषी मंत्री , मा . मुख्य प्रधान सचिव , महाराष्ट्र शासन , यांना सादर केला आहे. तरीही आमच्या स्तरावरुन सातत्याने लेखी पाठपुरावा करीत आहोत . या बाबत शासनाकडून कोणत्याही ठोस लेखी स्वरुपी निर्णय आज दिनांक पावेतो झाला नाही .

त्यानंतर आम्ही निसर्ग विज्ञान संस्माथेने सन्मानीय उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली . त्याअनुषंगाने मा . उच्च न्यायालयाने जनहित याचिका क्र . १०७ / २०२२ दि . १७ ऑक्टोबर २०२२ रोजी दिलेल्या आदेशानुसार महाराष्ट्र शासनाने दि . १५ नोव्हेंबर २०२२ रोजी त्या संदर्भात समिती गठीत केली असून सदर समितीने त्या बाबत सांगोपांग विचार करुन शासनास ९० दिवसांच्या आत तसा सर्वंकष अहवाल सादर करावयाचा होता . परंतु मा . न्यायमूर्ती सरांनी शासनाला आदेश दिले की आपण सर्प - विंचू दशांने दगावलेल्यांच्या कुटुंबाच्या सहाय्यतेसाठी आर्थिक मदतीचा हात मिळणे बाबत सहानुभूतीने विचार करुन . ही जनहित याचिका निकालात काढली .

त्यानंतर आम्ही सन्मानीय . पंतप्रधानजी यांना देखील दि. १३ / ०७ /२०२४ आणि दि . १३ / ०८ / २०२४ रोजी ईमेल पत्रव्यवहार जाहीर केले . परंतु आज दिनांक सकारात्मक विचार पावेतो झाला नाही . या मुळे सर्व सामान्य जनतेला आर्थिक मदती पासुन वंचित राहवे लागते यांची खूप खंत वाटते . तरी सुद्धा सर्प - विंचू दंशाने लोकांचा दुदैवी मृत्यू जात आहेत.

तसेच रविवार , दि . २२ डिसेंबर २०२४ रोजी दैनिक महाराष्ट्र टाइम्समध्ये एक बातमी प्रसिद्ध झाली होती . की माननीय आमदार महोदय , श्री . बाबुराव कदम कोहलीकर (शिवसेना) हिंगोली मतदारसंघाचे यांनी सर्प - विंचू दंशही नैसर्गिक आपत्तीच आहे . त्यासंदर्भात पिडित व्यक्तीला सर्प - विंचू दशांने दगावलेल्यांच्या कुटुंबाच्या सहाय्यतेसाठी आर्थिक मदतीचा हात मिळणे बाबत असे मत मांडून म्हणून नुकसान भरपाई द्यावी . असे मत श्री . बाबुराव कदम यांनी विधानसभेत वरील विषयावर याबाबत मुद्दा उपस्थित केल्याने हा विषय पुन्हा चर्चेत आला.

आपण लोकप्रतिनिधी निवडून देतो . ते कशासाठी की आपले प्रश्न मांडून आपल्याला न्याय मिळावा म्हणून ना ? तरी आपण लोकप्रतिनिधी या नात्याने या विषयावर साधक बाधक विचार करुन सर्प - विंचू दशांने दगावलेल्यांच्या कुटुंबाच्या सहाय्यतेसाठी आर्थिक मदतीचा हात मिळणे बाबत सानुग्रह अनुदान देण्याबाबत निर्णय आपल्या स्तरावरुन घेऊन शासनाचे संबंधित विभागाला अशास्वारुपाचे लेखी आदेश निर्गमित करण्याबाबत उद्युक्त करावे. तसेच सदर आदेश संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये लागू राहील अशा तरतूदींचा समावेश त्यात असावा . यासाठी वरील विषय धसास लावण्यात यावा अशी जनतेची कळकळीची नम्र विनंती आहे .

कै . सौ . सुजाता ताई शिवाजी देसले यांच्या निधनाबद्दल गावावर शोककळा पसरली . अनेकांनी या आकस्मिक दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे . त्यांच्या पश्चात पती , १ मुलगा ,१ मुलगी , असा परीवार आहे .

सदर निसर्ग विज्ञान संस्थाच्या कार्यकर्त्यांना घटनेची माहिती मिळताच सर्पमित्र या नात्याने कार्यकर्ते श्री . प्रवीण भास्कर भालेराव , श्री . उत्तम बांगर आणि श्री . वैभव पद्माकर कुलकर्णी घटनास्थळी जाऊन कुटुंबियांची भेट घेतली .
निसर्ग विज्ञान संस्था , डोंबिवली .

https://youtu.be/AWEA2aMUMo4?feature=sharedVaibhav,

320
7523 views
1 comment  
  • Vaibhav Padmakar Kulkarni

    भावपूर्ण श्रद्धांजली