पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, गृहमंत्री अमित शहा सह भारतीय सैन्य दलाचे आमदार लोणीकर यांच्याकडून अभिनंदन ;
देशभक्तीपर घोषणा व फटाक्याच्या आतिषबाजीने मंठा शहर दनानले.
भारतीय वायुसेना, नौसेना, थलसेनेच्या नेतृत्वाचं आणि ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये सहभागी झालेल्या सैनिकांचं मंठा भाजपा तर्फ अभिनंदन.
परतूर (प्रतिनिधी) -
भाऊसाहेब पाटील मुके -
भारतानं दहशतवादाविरुद्ध कणखर भूमिका घेत पहलगाममधील हल्ल्याला चोख प्रत्युत्तर म्हणून आज पहाटे ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ले करून ते नष्ट केल्याबद्दल मी भारतीय वायुसेना, नौसेना, थलसेनेच्या नेतृत्वाचं आणि ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये सहभागी झालेल्या सैनिकांचं मनापासून अभिनंदन करतो. भारतीय सैनिकांच्या क्षमतेवर देशाला पूर्ण विश्वास असून संपूर्ण देश एकजुटीनं त्यांच्यामागे उभा असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री परतूर विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार बबनराव लोणीकर यांनी केले. भारतीय वायुसेना, नौसेना, थलसेनेच्या नेतृत्वाचं आणि ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये सहभागी झालेल्या सैनिकांचं अभिनंदन करण्याकरिता आयोजित जल्लोष सोहळ्यात उपस्थित मंठा शहरातील नागरिकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी भारतीय सैन्याच्या समानार्थ उपस्थित आणि दिलेल्या देशभक्तीपर घोषणांनी व फटाक्याच्या आतिषबाजीने मंठा शहर दणाणून निघाले.
यावेळी पुढे बोलताना आमदार बबनराव लोणीकर म्हणाले की पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद आता सहन केला जाणार नाही, हे ‘ऑपरेशन सिंदूर’नं पुन्हा सिद्ध केलं आहे. पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांचा बळी गेला होता. या हल्ल्यानं संपूर्ण देश संतप्त होता. या हल्ल्याची जबाबदारी लश्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनांनी घेतली होती. याला प्रत्युत्तर म्हणून भारतानं आज भल्या पहाटे ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून नियोजनबद्ध, अचूक हल्ले करत दहशतवाद्यांचं कंबरडं मोडलं. या कारवाईत नऊ दहशतवादी तळ नष्ट करण्यात आल्याची माहिती आहे. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद संपूर्ण संपेपर्यंत अशाच पद्धतीनं कारवाई होत राहील, हा संदेश देण्यात आपण यशस्वी ठरलो आहोत. पुढे बोलताना आमदार बबनराव लोणीकर यांनी नमूद केली की देशाच्या सीमेपलिकडे जाऊन लष्करी कारवाई करण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती महत्वाची असते. प्रधानमंत्री मा.श्री. नरेंद्र मोदी साहेबांच्या साहसी, कणखर नेतृत्वानं ती नेहमीच इच्छाशक्ती दाखवली आहे. भारतीय सैन्यदलांना संपूर्ण स्वातंत्र्य, मोकळीक, ताकद देत त्यांच्यामागे भक्कमपणे उभं राहिल्याबद्दल प्रधानमंत्री मोदी साहेब, गृहमंत्री मा.श्री. अमित शहा जी, संरक्षणमंत्री मा.श्री. राजनाथसिंह जी यांचे देखील मी मनापासून अभिनंदन करतो.
या प्रसंगी भाजपा प्रदेश सदस्य सतीशराव निर्वळ, अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे परतुर मंठा विधानसभा अध्यक्ष भाऊसाहेब गोरे, संदीपभैया गोरे, वैजनाथराव बोराडे, भाजपा मंठा तालुका अध्यक्ष नितीन राठोड, कैलास बोराडे, भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष विलास घोडके, नगरसेवक तौफिक कुरेशी, जे. के. कुरेशी अरुण वाघमारे, विकास सूर्यवंशी, मनोज देशमुख, नगरसेवक दवणे, सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष अमोल मोरे, सरपंच आनंद जाधव,
राजेभाऊ खराबे, माऊली घोंडगे, कैलास चव्हाण, अमोल मोरे, दिगंबर आवचार, कैलास खराबे, शरद मोरे, प्रसादराव गडदे, नरेंद्र ताठे, भगवान लहाने, नारायण कणसे, जनार्दन घोडके, बाळासाहेब घोडके, सोनाजी जाधव, दिलीप राठोड व इतर मान्यवर उपस्थित होते.