
नाशिक मध्ये महाबोधी महाविहार मुक्ति आंदोलनासाठी शांती मार्च.
नाशिक ए.आय. एम. ए. समाचार महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन समिती जिल्हा नाशिक मुख्य प्रचारक अरुण शेजवळ व शशिकांत भालेराव 25 एप्रिल 2025 रोजी नाशिक ,नाशिक रोड येथे बुद्धगयेचे महाबोधी महाविहार मनुवादी व्यवस्थेच्या ताब्यातुन मुक्त करून बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे यासाठी काल शांती मार्च चे आयोजन करण्यात आले होते यावेळी नांदूर नाका या ठिकाणाहून रॅलीला सुरुवात करण्यात आली तथागतांना अभिवादन करून रॅलीची सुरुवात भदंत अनिरूद्ध थेरो औरंगाबाद व भिक्खू संघाच्या हस्ते करण्यात आली ह्या शांती मार्चमध्ये बुद्ध रूप पंचशील झेंडे व फुलांनी सजवुन धम्म रथ तयार केला होता.तथागत भगवान गौतम बुद्धांचा विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो बीटीसी १९४९
अॅक्ट रद्द करो अशा जयघोषाने परीसर दणानुन गेला तसेच सर्व महापुरुषांच्या नावाने जय जयकार करत रॅलीची सुरुवात करण्यात आली.सकाळी भिक्खू संघ श्रामनेर संघास अरुण शेजवळ यांच्या निवासस्थानी भोजनदान देण्यात आले यानंतर प्रवचन घेण्यात आले तसेच रॅलीची सुरुवात करण्यात आली रॅलीमध्ये असंख्य बौद्ध बांधव उपस्थित होते.ही जेलरोड मार्गे रॅली भीम नगर या ठिकाणी थांबविण्यात आली या वेळी बौद्ध उपासक गणेशभाई उनवणे व ऍड शशीभाई उनवणे यांनी शांती मार्च रॅलीचे स्वागत करून तथागत भगवान बुद्ध यांना पुष्प अर्पण करून आयोजकांचे या ठिकाणी स्वागत केले. गंधर्व नगरी येथील रहिवासी धम्म सेवक राजु रुपवते यांनी शांती मार्च मध्ये सर्व धम्म बांधवांना पाणी वाटप केले
तसेच बँक ऑफ इंडिया च्या वतीने पाणी वाटप करण्यात आले
शांती मार्चमध्ये बी टी ऍक्ट १९४९ रद्द झाला पाहिजे व महाबोधी महाविहार हे बौद्ध भिक्षू व बौद्धांच्या ताब्यात द्यावे या प्रमुख मागण्यासाठी या शांती मार्च चे आयोजन करण्यात आले होते.या रॅलीमध्ये गायक राहुल अन्वीकर यांचे भिख नहीं लेते हमारा अधिकार चाहीए हमको महाबोधी महाविहार चाहीए या गाण्यामुळे रॅलीला स्फुर्ती मिळत होती.पुढे छत्रपती शिवाजी महाराज नाशिक रोड येथील पुतळ्याला शशिकांत भालेराव अरुण शेजवळ, संजय घोडके विलास रामचंद्र गांगुर्डे , रत्नाकर साळवे, चंद्रकला गांगुर्डे विजय गांगुर्डे यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवरायांना पुष्पहार अर्पण करण्यात आला.
त्यानंतर पुढे रॅली नाशिक रोड रेल्वे स्टेशन येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा या ठिकाणी थांबविण्यात आली या ठिकाणी भंतेंच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून त्रिसरण पंचशील या ठिकाणी भंतेंच्या उपस्थितीत घेण्यात आले यानंतर अरुण शेजवळ मुख्य प्रचारक शशिकांत भालेराव
सामाजिक कार्यकर्ते संजय घोडके प्रशांत पगारे
यांचे मनोगत या ठिकाणी व्यक्त करण्यात आले.या रॅलीला सामाजिक कार्यकर्ते व बौद्ध उपासक उपासिका
प्रा.गंगाधर आहिरे ,
मा.नगरसेवक कुणाल वाघ ,विलास गांगुर्डे , मिलिंद देहाडे भीमचंद चंद्रमोरे,सम्राट फुले ,शैलाताई उघाडे,राजश्री शेजवळ , चंद्रकला गांगुर्डे लीनाताई खरे, वंदना गायकवाड,सुरेखाताई बर्वे ,संगीताताई बोडारे , अलका पंचफुला ,दिपक भंडारी , धर्मा जाधव ,विजय गांगुर्डे,सुषमा तपासे ,छायाताई मोरे छायाताई सुरवाडे अनिताताई मोठधरे
दादा सुरवडे ,पुनम वाघ ,सह. प्रा.जयश्री भालेराव,जयश्री गांगुर्डे छाया साळवे ,शैलाताई भालेराव ,बसपाचे जामखिडकर ,
शामराव भोसले , सद्धम्म टुर्स अॅणड ट्रॅव्हल्सचे मालक अभिजीत भोसले आदी बौद्ध उपासक उपासिका उपस्थित होते. कार्यक्रम चे घोषणा पत्र व सुत्रसंचालन डॉ बाबासाहेब आंबेडकर विचार मंच जिल्हाध्यक्ष प्रशांत भाऊ पगारे यांनी केले व कार्यक्रम शेवटी शशिकांत भालेराव यांनी आभार प्रदर्शन केले या रॅलीला यशस्वी करण्यासाठी आडगांव व नाशिकरोड पोलिस स्टेशन चे अधिकारी आणि पोलीस कर्मचारी यांना बंदोबस्त ठेवला.