logo

घ्या जाणून...नारळातील औषधी गुण आहेत स्वास्थ्य व सौंदर्याचे रक्षक

घ्या जाणून...नारळातील औषधी गुण आहेत स्वास्थ्य व सौंदर्याचे रक्षक

नारळ हे एक फळ आहे. नारळात अनेक औषधी गुण आहेत. ओल्या नारळामधील गराचा वापर सौंदर्य प्रसाधनामध्येही केला जातो. नारळ पाणी स्वाथ्यासाठी पौष्टीक असते. कार्बोहाइड्रेट, प्रोटीन, मिनरल्स, व्हिटामिन असे सर्व पोषक घटके नारळापासून मिळतात.

कच्चा नारळ खाल्ल्याने केस रेशमी आणि मुलायम होतात. याच्या सेवनाने त्वचेचा आतील भाग सुधारतो. हळूहळू चेहऱ्यावरील सुरकुत्याही लक्षणीय रित्या कमी होऊ लागतात. कच्च्या नारळात अँटी-ऑक्सिडेंट्स आणि अँटी-फंगल गुणधर्म असतात.

कच्च्या नारळात उच्च प्रमाणात फायबर असते जे बद्धकोष्ठतेच्या समस्येस मदत करते. झोपण्यापूर्वी कच्चे नारळ खाणे देखील हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले असते . यामध्ये असलेल्या चरबीमुळे शरीरातील चांगल्या कोलेस्टेरॉलची पातळी सुधारते. अशा प्रकारे, नारळ हृदयाशी संबंधित समस्यांचा धोका कमी करू शकतो.

नारळात अँटिऑक्सिडंट्स असतात. जसे की फिनोलिक कम्पाऊंड्स, जे ऑक्सिडेटिव्ह तणावाचा सामना करण्यास आणि जुनाट आजारांचा धोका कमी करण्यास मदत करतात.

नारळ हे कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सारख्या खनिजांचा स्त्रोत आहे, जे मजबूत आणि निरोगी हाडे राखण्यासाठी महत्वाचे आहेत.

नारळातील लॉरिक ऍसिडमध्ये अँटीमायक्रोबायल गुणधर्म असतात आणि हानिकारक जीवाणू, विषाणू आणि बुरशी यांच्याशी लढा देऊन ते रोगप्रतिकारक शक्तीला मदत करू शकतात.

नारळ पाणी हे एक नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट युक्त पेय आहे जे व्यायामानंतर किंवा गरम हवामानात शरीराला पुन्हा हायड्रेट करण्यास मदत करू शकते.

जेवणाला पर्याय म्हणूनही तुम्ही खोबरे खाऊ शकतात. नारळात फायबर्स मोठ्याप्रमाणात आढळतात. अपचन, छातीत जळजळीचा त्रास असणार्‍यांनी नारळाचा गर सेवन केल्यास लाभ होतो.

अनियमित मासिक पाळीचा त्रास असणार्‍या महिलांनी रोज 10 ग्रॅम ओल्या नारळाचा गर खावा. तसेच गायीचे दूधही प्यावे. मासिक पाळी संबंधी सर्व समस्या सुटतील. शीघ्रपतनाचा त्रास असणार्‍या पुरूषांनी रोज सुखे खोबरे आणि गायीच्या दूध प्यायल्याने विशेष लाभ होतो

नारळ पाणी पोटाचे विकार दूर करण्‍याचे काम करते. अल्सरसारखा आजार बरा होतो. किडनी, थायरॉइड, डायबिटीज व मुत्राशयाचा विकार असलेल्या लोकांनी नारळ पाणी मोठ्याप्रमाणात सेवन करावे. नारळात अनेक व्हिटामीन असतात ते पचनास फार लाभदायी असतात. पोट दूखत असल्यास किंवा गॅस झाल्यास नारळ पाणी प्यावे. नारळ पाण्याने उलटीही थांबते.

नारळ खोकल्यावर एक उपाय आहे. नारळाच्या दूधात एक चमचा खसखस आणि एक चमचा मध मिसळून रोज रात्री पिल्याने फायदा होतो.

तोंडात फोड असल्यास ओले नारळाच गर खावा आणि जास्तीत जास्त नारळ पाणी प्या.

नारळाचे तेल रोज त्वचेवर लावल्यास त्वचा सतेज होते.

आंबट दही, मुलतानी माती आणि खोबरेल तेल एकत्र करून लावल्यास केस चमकदार होतात.
दररोज दोन-तीन नारळाचे पाणी सेवन केल्यास चेहरा उजळतो.

हिवाळ्यात रोज रात्री सुखे खोबरे खावे. रात्री झोपताना चेहरा, मान आणि त्वचेवर खोबरेल तेल लावून हाताने हळूवार मसाज करावी. सकाळी उठल्यावर पाण्याने चेहरा धुऊन घ्यावा. काही दिवसातच सुरकुत्या नाहीशा होतील. नारळाचा गर चेहर्‍यावर लावल्याने, चेह-यावरील व्रण नाहिसे होतात.

गर्भवती महिलांनी रोज नारळाचा गर खाल्याने त्यांची प्रकृती ठणठणीत राहते. तसेज सुदृढ बाळ जन्माला येते. खोबरेल तेलात बदाम बारिक करून टाकावे. डोके दुखीवर हे तेल औषणीचे काम करते.
पोटात जंत झाल्यास रोज सकाळी किसलेले खोबरे खावे.



संकलन व लेखक
उपचार व आहार तज्ञ
डॉ. हुजेफा (सांगली)
संपर्क - 8446674786

0
22 views