logo

रायपूर गावात डेंग्यू" मुळे मृत्यू  संतप्त नातेवाईकांनी प्रेत आणला ग्रामपंचायत समोर, महिलांचा ठिय्या आंदोलन आणि नागरिकांचा ग्रामपंचायत लं घेराव

रायपूर गावात डेंग्यू" मुळे मृत्यू  संतप्त नातेवाईकांनी प्रेत आणला ग्रामपंचायत समोर, महिलांचा ठिय्या आंदोलन आणि नागरिकांचा ग्रामपंचायत लं घेराव

रायपूर प्रतिनिधि
बुलडाणा तालुक्यातील रायपूर ग्रामपंचायतच्या गलथान कारभार आणि दुर्लक्षपणामुळे गावात घाणीचे साम्राज्य पसरलेले असून, गावातील नाल्या तुडुंब भरलेले आहेत. ज्यामध्ये डासाची उत्पत्ती होऊन, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अशातच गावातील 48 वर्षीय गजानन करडेल या व्यक्तीला डेंग्यूचे निदान झाल्यानंतर प्रथम बुलडाणा व नंतर छत्रपती संभाजी नगर येथील घाटी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले, उपचार सुरू असताना आज 20 जुलै रोजी त्यांचा मृत्यू झाला आणि त्यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी रायपूर ग्रामपंचायत प्रशासनाचा निषेध करत मृतदेह हा छत्रपती संभाजीनगर येथून दुपारी 4 वाजेच्या सुमारास सरळ ग्रामपंचायत समोर आणल्याने एकच खळबळ उडाली.
नागरिकांचे धोक्यात आलेले आरोग्य वाचवावे अशी मागणी लावून धरली. नातेवाईक व गावकऱ्यांचा हा आक्रमक पवित्रा पाहता ठाणेदार दुर्गेश राजपूत यांनी आपल्या पथकासह ग्रामपंचायत गाठून संतप्त झालेल्या लोकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर ग्रामपंचायत कडून आश्वासन मिळाल्यानंतर प्रेतावर अंतिम संस्कार करण्यात आले.

संतप्त नागरिकांना समजावण्याचा प्रयत्न ठाणेदार दुर्गेश राजपूत यांनी केला

मात्र अंतिम संस्कार केल्यानंतर संतप्त गावकरी ग्रामपंचायत समोर पोहोचले व त्यांनी ग्रामपंचायतचा घेराव घालत बैठा आंदोलन सुरू केला. यावेळी ग्रामसेवक गणेश पायघन ग्रामस्थांना समजावण्याचा प्रयत्न करीत होते. तरी ही समस्यांची सोडवणूक झाली नाही आणि त्या प्रेताचे अंतिम संस्कार करून नागरिकांनी पुन्हा ग्रामपंचायत गाठून समस्या हल करण्याचे लेखी आश्वासन ग्राम सेवक गणेश पायघन व विस्तार अधिकारी गवते साहेब यांनी मृत वेक्तींच्या नातेवाईकांना दिले आहे. तेव्हा वातावरण शांत झाले आणि सर्व नागरिक आप आपल्या घरी निघाले

102
6430 views