logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

मोताळा तालुक्यात 'गुड मॉर्निंग' पथक झाले बेपत्ता...

मोताळा तालुक्यात 'गुड मॉर्निंग' पथक झाले बेपत्ता...
सागर वानखेडे jurnalist (Motala) बुलढाणा.

संपूर्ण महाराष्ट्रात स्वच्छ भारत मिशन राबविण्यात येत आहे.मात्र ग्रामीण भागात ही योजना प्रभाविपणे राबविण्यात येते का? यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे पाहावयास मिळत आहे. मोताळा तालुक्यात 'गुड मॉर्निंग' पथक झाले बेपत्ता झाल्याचे वास्तव पाहायला मिळत आहे.
गाव दुर्गंधीमुक्त करण्यासाठी आतापर्यंत मोताळा तालुक्यात १९ हजार ५०० खासगी व २५ ठिकाणी सार्वजनिक शौचालयांची निर्मिती करण्यात आली आहे. परंतु तरी सुद्धा उघड्यावर शौचास जाणाऱ्यांची संख्या कमी न होता ती दिवसेंदिवस वाढतच जात असल्याचे दिसून येत आहे. त्यातच गुड मॉर्निंग पथक बेपत्ता झाल्यामुळे गांव दुर्गंधीमुक्त करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. तालुक्यात जवळपास २९ हजार २०९ कुटुंब संख्या आहे. त्यापैकी २०१३ पासून शहरासह ग्रामीण भागात १९ हजार ५३५ कुटुंबांना स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालये मंजूर करण्यात आले आहे. त्यापैकी काही कुटुंबांनी २०१३ पूर्वी या योजनेचा लाभ घेऊन शौचालय बांधली आहेत. तर काही लाभाथ्र्यांचे शौचालय बांधण्यासाठी अर्ज प्रस्तावित असून लवकरच त्यांना शौचालयाच्या निधीचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती संबंधित विभागाकडून देण्यात आली आहे. निधी त्यांच्या खात्यात जमा करण्यात तसेच तालुक्यात २५ सार्वजनिक शौचालयांना मंजुरी मिळाली आहे. त्यापैकी १४ ठिकाणी सार्वजनीक शौचालयांची निर्मिती आली असून उर्वरित सार्वजनिक शौचालयांचे काम सुरू आहे. तसेच आणखी काही सार्वजनिक शौचालय प्रस्तावित आहेत. २०१३ नंतर जवळपास १९ हजार ५३५ कुटुंबांनी शौचालयासाठी शासनाचा निधी खर्च करून शौचालये बाधले आहे. तर काही नागरिकांनी आधीच या
आळा घालण्यासाठी गुडमॉर्निंग पथकांची नियुक्ती करण्यात आली होती, परंतु गुडमॉर्निंग पथक हे केवळ कागदोपत्री ठरले. या पथकाने कोणतीच ठोस कारवाई केली नाही त्यामुळे उघड्यावर शौचास जाणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. तरी संबंधीत विभागाने याकडे लक्ष देऊन उघड्यावर शौचास जाणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. -डॉ. शरद काळे, मोताळा.येणार असल्याची माहिती संबंधित विभागाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे बहुतांश नागरिकांकडे करण्यात शौचालय आहे. तालुक्यात एवढ्या मोठ्या संख्येने शौचालय बांधूनही तालुक्यातील गावे ही हागणदारी मुक्त झाली नाही. गावालगत प्रवेशद्वाराला लागूनच रस्त्याच्या कडेला गावातील नागरिक उघड्यावर शौचास बसतात. त्यामुळे त्याठिकाणी सर्वत्र घाण पसरली असून सर्वत्र दुर्गंधी पसरलेली आहे. त्यामुळे शासनाने योजनेच्या माध्यमातून शौचालय एवढा खर्च करून काय फायदा, बांधले आहे. प्रस्तावित लाभात्यांना असा प्रश्न उपस्थित करण्यात येत घाण व दुर्गंधी पसरत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. वास्तविक पाहता प्रत्येक गाव दुर्गंधी मुक्त होण्यासाठी शासनाने शौचालयांवर कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला आहे. तसेच मोठ्या प्रमाणात जनजागृती देखील केली आहे. एवढेच नव्हे तर उघड्यावर शौचास बसणाऱ्यावर कारवाई करण्यासाठी तालुक्यात चार गुड म मॉर्निंग पथकांची नियुक्ती केली होती. परंतु गुडमॉर्निंग पथक हे केवळ कागदोपत्री ठरले आहे. परिणामी मागील काही दिवसांपासून उघड्यावर शौचास जाणाऱ्यांच्या सुद्धा लवकरच त्यांच्या शौचालयाचा आहे. उघड्यावर शौच केल्यामुळे संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ
*उघड्यावर शौचास जाणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी....*
मागील बऱ्याच वर्षांपासून झाली नाही. उघड्यावरील शौचास शासनाच्या वतीने दुर्गंधीमुक्तीवर जोर दिला जात आहे. त्यासाठी शासनाच्या वतीने नागरिकांना शौचालय बांधण्यासाठी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्याचा तालुक्यात हजारो नागरिकांनी लाभ घेत शौचालय बांधले आहे. शिवाय काही ठिकाणी सार्वजनीक शौचालयांची सुद्धा निर्मिती करण्यात आली आहे. तरीही उघड्यावर शौचास जाणाऱ्यांची संख्या कमी झाल्याचे दिसून येत आहे. हे सर्व चित्र ग्रामीण भागात जास्त प्रमाणात पहावयास मिळत आहे. या गंभीर प्रश्नाकडे स्थानिक ग्रामपंचायतींचे सुद्धा दुर्लक्ष होत आहे. आजही ग्रामीण भागात प्रवेश करतांना गावालगत रस्त्याच्या कडेला सर्वत्र घाण आणी दुर्गंधी दिसून येत आहे. घरी शौचालय असताना नागरिकांना उघड्यावर शौचास जाण्याची आवश्यकता नाही. तरी सुध्दा काही नागरिक उघड्यावर शौचास जाताना दिसून येत आहेत. त्यामुळे शासनाने शौचालयावर केलेला कोट्यवधी रुपयांचा खर्च वाया गेल्याचे दिसून येत आहे.

136
1560 views

Comment