जवखेडा जमीन घोटाळा प्रकरणात वारसांचे हक्क मागणी
जळगाव : जवखेडा सीम तालुका एरंडोल येथील ९७ एकर जमीन संबंधित भूसंपादन आणि कागदपत्रांच्या व्यवहारांमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. जमन शिवजी पाटील यांच्या मृत्यूनंतर त्यांची जमीन वारसांना न मिळता बेकायदेशीरपणे ग्रामपंचायतीला देण्यात आली आणि सरकारच्या नावावर नोंद करण्यात आली. रामजी रावजी पाटील यांच्या हत्या आणि कागदपत्रांच्या गायब होण्याने वारसांना त्यांच्या हक्कांसाठी संघर्ष करावा लागत आहे.
वारसांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि मंत्रालयाकडे अनेक अर्ज केले असून, लोकपाल आणि लोकायुक्तांनाही याबाबत लेखी तक्रार केली आहे. मात्र सध्या कोणतीही योग्य कारवाई झालेली नाही. या जमीन घोटाळ्याला महाराष्ट्रातील सर्वात मोठा भ्रष्टाचार मानण्यात येत असून, संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई आणि जमिनीचे कागदपत्रांसह वारसांना परत मिळवून देण्याची मागणी करण्यात येत आहे.