धाबा ग्रामपंचायत: सुभाष नेवारे घरकुल योजना वंचित
धाबा : धाबा ग्रामपंचायत हद्दीतील मंगलपेठ गावात राहणारे सुभाष नेवारे हे आजीवन रहिवाशी असून दारिद्र रेषेखालील उत्पन्नावर आहेत. तरीही त्यांना ग्रामपंचायत धाबा कडून घरकुल योजनेचा लाभ अद्याप मिळालेला नाही. अनेकदा त्यांनी ग्रामपंचायतकडे अर्ज केले असला तरी त्याचा अजूनपर्यंत विचार केला गेलेला नाही.
19 मे मंगळवार रोजी राष्ट्रीय मानवाधिकार व न्याय आयोगाचे जिल्हाध्यक्ष अमित अलोणे यांनी सुभाष नेवारेंशी भेट घेतली आणि त्यांची परिस्थिती समजून घेतली. सुभाष नेवारे सध्या एका एकरूमच्या खोलीत वास्तव्य करीत आहेत, तरीही केंद्र सरकारकडून मोठ्या निधी उपलब्ध असूनही त्यांना घरकुल योजना लाभलेली नाही. राष्ट्रीय मानवाधिकार न्याय आयोगाने स्थानिक प्रशासनाकडे अर्जाचा योग्य विचार करण्याची विनंती केली आहे.