logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

कविता मोडीचे सरकार

कविता
मोडीचे सरकार

(सन २०१४ च्या राजकीय परिवर्तनापासून आजच्या वास्तवापर्यंतचा प्रवास)

मोदींची हवा नव्हती, नाही म्हणणाऱ्यांनीच हवा केली ।
विनाकारण काहीही म्हणा, काँग्रेस मात्र संपवायची होती ॥१॥

राजे गेले, रजवाडे गेले, परक्यांचे घोंगडेही गेले ।
स्वातंत्र्याची पहाट उगवता, संस्थानिक काँग्रेसची चांदी झाली ॥२॥

पण नियती ही नियती असते, तिच्या मनात काही वेगळे असते ।
दृष्टीआड असलेला एक निश्चल तारा, सर्व काही दूरून पाहत होता ॥३॥

मतांचे राजकारण काँग्रेसचे, धर्मरक्षणाचे राजकारण भाजपचे ।
समतेचे राजकारण सपा-बसपाचे, विनाकारण राजकारण समाजवाद्यांचे ॥४॥

मतांपायी काँग्रेस हरली, आरक्षणापायी सपा-बसपाही गेली ।
आप ने जोरदार प्रवेश केला, पण गणित बिघडता स्वतःच हरवली ॥५॥

गणिते ही गणितात असतात, कुठे बेरीज तर कुठे वजाबाकी ।
गुणाकार कधी, भागाकार कधी; न सुटलेले राजकारण म्हणजे बीजगणित बाकी ॥६॥

झाले गेले विसरून जा, पुन्हा सर्वांनी कामाला लागा ।
अच्छे दिन आने वाले हैं, म्हणत नवे सरकार पुढे सरसावले ॥७॥

जातीभेद, धर्मभेद विसरा, गोधरा, मंडल-कमंडलही विसरा ।
सर्व काही विसरलात तरी, माझ्या भीमाला मात्र विसरू नका ॥८॥

आकाशवाणी झाली जणू, जाती-धर्माची लढाई संपणार ।
विषमता जाऊन समता येईल, असा नवा संदेश घुमणार ॥९॥

सबको राम, सबको काम, सबका साथ, सबका विकास ।
या घोषणांनी भारावून गेला, नवभारताचा प्रत्येक श्वास ॥१०॥

स्वप्नांचा जादूगार म्हणे, भारताला नंबर वन करणार आहे ।
अमेरिकेपुढे नसलो तरी, चीनपुढे निश्चित नेणार आहे ॥११॥

दहा वर्षांचा काळ सरला, जनता आता हिशोब मागत आहे ।
घोषणांच्या त्या गर्दीमध्ये, वास्तव कुठे धावत आहे ॥१२॥

रस्ते झाले, पूल उभे राहिले, डिजिटल भारत पुढे गेला ।
पण बेरोजगार तरुणांच्या डोळ्यात, प्रश्न अजूनही तसाच राहिला ॥१३॥

मोफत धान्य, घरकुल, योजना गावोगावी पोहोचल्या ।
तरी शेतकऱ्यांच्या घामामधल्या, वेदना पूर्ण न मावळल्या ॥१४॥

राममंदिराचे स्वप्न पूर्ण झाले, भक्तांच्या भावना फुलल्या ।
पण धर्माच्या नावाखाली, मनामनांत भिंती उभ्या राहिल्या ॥१५॥

कोणी म्हणे विश्वगुरू भारत, कोणी म्हणे लोकशाही धोक्यात ।
सत्य कुठे आणि असत्य कुठे, जनता उभी द्विधा मनात ॥१६॥

माध्यमांची भाषा बदलली, प्रश्न विचारणे गुन्हा ठरला ।
जयजयकाराच्या गर्दीमध्ये, सामान्य माणूस हरवून गेला ॥१७॥

आरक्षण, संविधान, समता, पुन्हा चर्चेच्या केंद्रात आली ।
बाबासाहेबांच्या विचारांची, नव्या पिढीला आठवण झाली ॥१८॥

जात अजून जिवंत आहे, धर्म अजून राजकारणात आहे ।
समतेच्या त्या बेगमपुराचा, रस्ता अजून शोधात आहे ॥१९॥

ना अंध विरोध, ना अंध समर्थन, जनता आता जागी झाली ।
काम कुणाचे, दोष कुणाचे, विचारण्याची वेळ आली ॥२०॥

भारत माझा मोठा व्हावा, विज्ञानाने जग जिंकावे ।
पण संविधानाच्या सावलीतच, स्वातंत्र्याचे फूल फुलावे ॥२१॥

अच्छे दिनच्या स्वप्नामधुनी, अनुभवांचे ढग सरले ।
जनतेच्या न्यायाच्या दरबारात, आता प्रश्न नवे उभे राहिले ॥२२॥

सत्ता येती, सत्ता जाती, इतिहास मात्र साक्षी राहतो ।
जनतेच्या मनातील राजा, कर्मानेच मोठा ठरतो ॥२३॥

लोकशाहीच्या या भूमीत, मतदारच खरा जनार्दन आहे ।
दिल्लीच्या प्रत्येक सिंहासनावर, जनतेचाच अंतिम निर्णय आहे ॥२४॥

कवी : अण्णा दवणकर
संक्रापूर, ता. राहुरी, जि. अहमदनगर

*Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

1
99 views

Comment