logo

धाराशिव येथे मन की बात संपन्न. भानूनगर धाराशिव येथे आ.राणा जगजितसिंह पाटील, जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्यासह असंख्य भा

धाराशिव येथे मन की बात संपन्न.
भानूनगर धाराशिव येथे आ.राणा जगजितसिंह पाटील, जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्यासह असंख्य भाजपा पदाधिकारी यांनी श्री गणपती मंदिर येथे पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी यांचा 'मन कि बात' हा कार्यक्रम ऐकला. तत्पूर्वी श्री गणरायाचे दर्शन घेतले तसेच पंडित दिनदयाल उपाध्याय यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

नव्यानेच भारतात आलेल्या चित्त्यांविषयी चर्चा करून त्याविषयी नागरिकांनी MY GOV यांच्या माध्यमातून सल्ला देण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे. सांकेतिक भाषेचा प्रवास आणि होत असलेल्या विकासाचे महत्त्व त्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले. सुरत येथील कन्या अन्वी आपल्या आजारावर मात करून योग विद्येत निपुण कामगिरी करत आहे. तिचा आदर्श घेऊन आपण योग विद्या आत्मसात करावी. चंदीगड येथील विमानतळाला शहीद भगतसिंगाचे नाव देण्यात आहे त्याबद्दल पंजाब राज्यातील नागरिकांचे अभिनंदन यावेळी त्यांनी केले. अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करून आपल्या क्रांतिवीराचे स्मरणही त्यांनी यावेळी करून दिले.

याप्रसंगी जिल्हा संयोजक श्री.नेताजी पाटील, सचिन तावडे, लक्ष्मण माने, गणेश पानसरे, नितीन इंगळे, विनोद निंबाळकर, अमोल राजेनिंबाळक, देवा नायकल, हिम्मत भोसले, ओम नाईकवाडी, परिसरातील बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

0
14635 views